प्रतिनिधी / सोलापूर
देशावरील कोरोनाचे महासंकट दूर करण्यासाठी आम्ही प्राधन्य देत असताना केंद्र सरकार मात्र राम मंदिर बांधून कोरोना बरा होऊ शकतो, असा निष्कर्ष काढत आहे. मात्र मंदिरापेक्षा कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न व्हावा. मंदिर बांधल्याने कोरोना काय बरा होणार आहे का ?, असा सवाल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाहि त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी रविवारी सोलापूर दौऱयावर आले असताना पत्रकार पाfरषदेत ते बोलत होते. एकीकडे कोरोनाचे संकट आहे, तर दुसरीकडे भाजप सरकार राम मंदिर बांधण्यास महत्त्व देत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, राम मंदिर बांधण्यापेक्षा देशावर कोरोनाचे संकट आहे, ते दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पीक कर्जाबाबत शेतकऱयाच्या, बँकांच्या ज्या काहि अडचणी आहेत, ते सहकारमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काहि दिवसात प्रश्न निकाली काढू, असेही पवार म्हणाले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते.
स्थानिक लोकांचे सहकार्य महत्त्वाचे
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अकोला आणि मुंबईमध्ये स्थानिक लोकांनी सहकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे नागरिकांनी तंतोतंत पालन केले. त्यामुळे धरावी याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. सोलापूर जिuह्यातील कोरोनाच्या या संकटात जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
अजून काय म्हणाले शरद पवार
- कोरोनाचा आढावा घेण्यासाठी 21 किंवा 22 तारखेला मुख्य सचिव अजय गुप्ता यांच्यासह कमिटीस सोलापूरसह बार्शी, अक्कलकोटला पाठवणार
-मुंबई, जळगाव, नाशिकनंतर सोलापूर जिuह्यातील कोरोनाची पाfरस्थिती गंभीर - बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये कोरोनाच्या प्रादुभा&वात वाढ
- राज्यापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर सर्वाधिक
- राज्य शासनाकडून आरोग्य सुविधा, अनुदान मिळवून देऊ
- सोलापुरात कोरोना वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणे
- मुख्यमंत्र्यांच्या कानावर सोलापूरच्या परिस्थितीची माहिती घालणार
- कोणतेही राजकीय भाष्य करण्याची ही वेळ नाही.
-सर्व पक्षातील नेते, आमदार, खासदारांनी कोरोनाच्या संकटाला लढा देण्यासाठी काम करणे गरजेचे.