प्रतिनिधी/ सातारा, भुईंज
सातारा तालुक्यातील किडगावचे संग्राम शिर्के (वय 26) यांचा वाई पोलीस स्टेशनला डय़ुटीला जात असताना रायगाव फाटय़ाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दि. 25 रोजी अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. संग्राम शिर्के यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात किडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले संग्राम शिर्के हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून किडगाव परिसरात ओळखले जातात. त्यांचे शिक्षण किडगावच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत झाले. साताऱयाच्या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले असून ते पोलीस दलात भरती झाले होते. त्यांचे वडिल हे टेम्पो चालवून दोन्ही मुलांना पोलिसांत भरती केले. संग्राम हे लहान असल्याने त्यांच्याही विवाहाकरता स्थळ पाहणी सुरु होती. अतिशय कष्टातून दोन्हीही मुले पोलिसमध्ये भरती केली. परंतु घरात सर्वात लहान असलेला संग्राम हा गोड मनमिळावू स्वभावाचा. गावात मुलांच्यामध्ये सतत मिसळून असायचा. डय़ुटीवर जात असताना रायगाव फाटय़ाजवळ दि. 25 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांना तेथून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात वाहनधारकांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर किडगाव येथील स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.