वार्ताहर /केरी दि
रावण कॉलनी, सत्तरी येथील महादेव गावस यांच्या काजू बागायतीत आग लागल्याने सुमारे 100 काजू, आंबे कलमे आणि माडाची कवाथे जळून खाक झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. आज ( शुक्रवार) दुपारी ही घटना घडली. अंजुणे धरण ग्रस्त असलेले केळावडे रावण कॉलनी येथील लोकांनी आपल्या जमिनीत काजू लागवड व माड- पोफळीची लागवड केलेली आहे. यापैकी महादेव गावस यांच्या सुमारे 1 हेक्टर जमिनीत काजू आणि अन्य लागवड केलेली होती. यात बहुतेक काजू कलमे पीक देण्यास सुरुवात केलेली होती. आज दुपारी ही आग लागल्याची काही इतर शेतकऱयांनी पाहिले असता त्यांनी ती काबूत आणली. तोपर्यंत महादेव गावस यांची मोठी नुकसान केली. पण ती आग विजवण्यात आल्याने अन्य कुणाच्या बागायतीत पसरली नाही त्यामुळे मोठी हानी टळली. आग लागण्याचे कारण समजले नाही. पण बागायती वरून वीज वाहिन्या गेलेल्या आहे आणि त्या खूप जीर्ण झालेल्या आहे. तसेच त्या लोंबत आहे. त्यामुळे वीज वाहिन्यामुळे ही आग लागल्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.दरम्यान महादेव गावस यांनी या घटनेची माहिती केरी ग्रामपंचायतीला दिली आहे.