दररोज 700 कि.लो. भेंडी उत्पादन ः भाजी लागवडीच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ बनण्यासाठी प्रोत्साहन
उदय सावंत / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील रावण केरी गाव भाजी उत्पादनात गोवा राज्यात अग्रेसर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा भेंडीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून रावण गावात भेंडीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली झाले. रावण गावात दरदिवशी 700 किलो भेंडी उत्पादन घेतले जाते. याचा पुरवठा फलोत्पादन महामंडळाच्या वेगवेगळय़ा भाजी विक्री आस्थापनावर केला जातो. यामुळे या भागातील भेंडी उत्पादकांचा आदर्श इतर गावातील शेतकरी उत्पादकांनी घेऊन आपल्या बागेत ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या उद्देशाने अशा प्रकारचे पीक घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन या भागातील शेतकरी बांधव करत आहेत. केरी पंचायत क्षेत्र असलेल्या अंजुणे धरण प्रकल्पाच्या जलाशयावर गेल्या काही वर्षांपासून रावण गावातील शेतकरी आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळय़ा प्रकारची भाजी लागवड करीत आहेत.
विविध प्रकारच्या भाजीची लागवड
रावण गावातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून थोडय़ा प्रमाणात भाजीची लागवड करीत होते. त्यानंतर काही शेतकऱयांनी भाजीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यावर भर दिला. यात विशेष लक्ष घालून गेल्या काही वर्षांपासून भेंडी लागवडीवर भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तरी भाजी उत्पादनात रावण गावाने हा गोमंतकाच्या नकाशावर अग्रेसर असल्याची ओळख निर्माण केली आहे. गेल्या वषी सुमारे दहा टनपेक्षा जास्त भेंडी उत्पादन घेण्यात आली. यंदाही चांगल्या प्रकारची भेंडीचे उत्पादन झालेले असून सध्या मोठय़ा प्रमाणात भेंडीची तोडणी सुरू आहे. या भागामध्ये होणाऱया भेंडीचे उत्पादनाला मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे.
राधिका, जेके बियाण्याच्या लागवडीवर भर
दरम्यान, या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यंदा या उत्पादकांनी राधिका व जेके या बियाणांची लागवड केली आहे. याचा परिणाम चांगला दिसला असून या जातीच्या भेंडी लागवडीला अत्यंत पोषक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सुरुवातीच्या काळात फलोत्पादन महामंडळाने या भेंडीची खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात चालढकल केली, मात्र त्यानंतर वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश येऊन फलोत्पादन महामंडळाने भेडी खरेदीला मान्यता दिली.
दरदिवशी 700 किलो भेंडीची उत्पादन
जवळपास अडीच महिन्यांपूर्वी या भागांमध्ये भेंडीचे बियाणे घेतले होते. सध्यातरी चांगल्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झालेले आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दर दिवशी 700 किलो पेक्षा जास्त भेंडीचे तोडणी होत असून एक दिवस आड फलोत्पादन महामंडळाचे वाहन घटनास्थळी येऊन यासंदर्भाची खरेदी करीत असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली. रावण येथील वीस पेक्षा जास्त शेतकरी भाजी उत्पादन क्षेत्रात उतरले आहे. या भागातील शेतकऱयांच्या कष्टाचा इतर गावातील शेनकऱयांनी घ्यावा. प्रत्येकाकडे पडीक जमीन असते. मात्र ही जमीन लागवडीसाठी विकसित केल्यास गोवा भाजीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होईल.