राशिवडे / वार्ताहर
राशिवडे ता. राधानगरी येथील मगदुमकी आणि उरुट नावाच्या परिसरातील सुमारे चार एकर क्षेत्रातील ऊस आगीमध्ये भस्मसात झाला. यामध्ये सहा शेतकर्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, येथील मगदुमकी आणि उरुट नावाच्या परिसरात रघुनाथ मगदूम, सागर मगदूम, कुमार मगदूम, नारायण चौगले, हरी पाटील, बळवंत पाटील या शेतकऱ्यांची ऊसशेती आहे. आज दुपारी अचानक ऊसाला आग लागली. बघता-बघता ही आग पसरत गेली. या आगीची माहीती कळताच आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु वार्यामुळे हीआग पसरतच गेली. थोड्या वेळात भोगावती कारखान्याची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र असल्याने आग पसरु नये, यासाठी ऊसाला भांगे घालुन दक्षता शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे आग आटोक्यात आली. जर आग पसरली असती तर अजून मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झाले असते.