जीवघेण्या कोरोनाचे गांभीर्य कळणार?
दीड वर्षापूर्वी राहू बदलल्यानंतर अदृश्य रुपाने कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला. नोव्हेंबर 2019 ला त्याचा गौप्यस्फोट झाला. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकार व आरोग्यखाते सर्वदृष्टीने प्रयत्न करत आहे, पण लॉकडाऊनचे गांभीर्य लोकांना कळत नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्च दरमाणसी 3 ते 7 लाखापर्यंत आहे, असे म्हणतात. एकाच कुटुंबात जर चार-पाच लोकांना त्याची लागण झाल्यास ते किती महागात पडेल, सांगता येणार नाही. सरकारी इस्पितळात सर्वांनाच मोफत उपचार होतील, असे सांगता येणार नाही. त्यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतरही किमान वर्षभर तरी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे 19 सप्टेंबरला राहू, केतू बदलल्यावर रोगाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. पण पूर्ण संपणार नाही. त्यानंतर नाक, कान, घसा आणि हगवणीचे प्रकार सुरू होतील. प्रत्येकाने आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगावी. कारण वृषभ रास ही घशाशी संबंधित आहे व राहूचे त्या राशीत प्रवेश नवे संसर्ग करण्याची शक्मयता आहे. कोरोनाच्या निमित्ताने सरकारकडून सर्वांना मदत जाहीर केली जाते. सधन व सुखवस्तू लोकांचा प्रश्नच येत नाही. द्रारिद्रय़रेषेखालील लोकांना व जातीनिहाय बऱयाच सवलती मिळतात, पण मध्यमवर्गीयांना मात्र कोणी विचारीत नाही. शेवटी ती ही माणसेच आहेत. मध्यमवर्गीय समाज हा मानाने व प्रति÷sने जगणारा आहे. त्यातही काही खूप गरीब लोक आहेत, त्यामुळे जातपात व धर्म बाजूला ठेवून मध्यमवर्गीयांनाही जगण्याच्या सोयीसवलती सरकारने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच लोकशाहीप्रधान देश असल्याने जात, पात, धर्म न पाहता घराण्यातील एकेका व्यक्तीला त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी दिल्यास लोकांचा आशीर्वाद मिळेल, तसेच गरीब, श्रीमंत, भेद-भाव न करता देशात एकाच श्रेणीची रेशनकार्डे ठेवावीत. ज्याला गरज आहे तो घेईल. हवापाणी, जीवनमृत्यू या सर्व बाबतीत परमेश्वर पक्षपात करत नाही, मग मनुष्याने हा पक्षपात का करावा? सर्वांना समान दर्जाने वागविल्यास ईश्वरकृपा निश्चितच होईल व ब्रह्मांडातील नवग्रहांसह सर्व दैवीशक्ती खूष राहतील. पक्षपाती धोरणामुळेच न्याय, अन्याय, दंगेधोपे, दरोडे, लुटालूट यांचे प्रमाण वाढत आहे. हा एकप्रकारचा दैवीकोपच म्हणता येईल. त्यासाठी गेल्या दोन महिन्यात लॉकडाऊनमुळे निसर्गाने आपल्याला जो काही धडा दिलेला आहे. त्यापासून आपण काही बोध घेणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमहाभूतांचा प्रभाव चराचर सृष्टीवर असतो. लक्ष्मी व अवदसा या दोन बहिणी असून सध्या अवदसेचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे आरोग्य व आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे.
मेष
मंगळामुळे काही बाबतीत अतिशय चांगली फळे मिळतील. पण व्यसन वगैरे लागण्याची शक्मयता. मित्रमंडळीशी जेवढय़ास तेवढेच संबंध ठेवावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आतापर्यंत अनेकवेळा प्रयत्न करूनही न झालेली महत्त्वाची कामे मात्र या मंगळामुळे होतील. प्रखर कालसर्प योगात रास अडकलेली आहे. त्यामुळे सर्व बाबतीत जपून राहणे आवश्यक.
वृषभ
मंगळामुळे सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. गिरणी किंवा कारखाना अथवा तत्सम व्यवसायात फायदा होईल. सरकारी नोकरीत असणाऱयांनी जरा सावध राहणे आवश्यक. माता-पित्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कालसर्प योगाचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. कुलदेवतेची आराधना चुकवू नका. अन्यथा अडचणी वाढू शकतात.
मिथुन
मंगळ खर्चाचे प्रमाण वाढवील. कर्ज प्रकरणापासून दूर रहा. वाहन दुर्घटना, खोलपाणी आणि विहिरी यापासून सावध रहावे. अतिस्पष्टवक्तेपणा व बोलकेपणावर नियंत्रण ठेवा. तोंडातून सहज गेलेले एखादे शब्द मोठे महाभारत घडवेल. कालसर्प योगाचा प्रभाव असल्याने कोणतेही काम रखडू देऊ नका. पूर्णविचारांती कोणतेही निर्णय घ्या.
कर्क
मंगळ आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. कोठून तरी अचानक पैसा मिळू शकेल, पण हा मंगळ दूषित असल्याने व्यसन व इतर अनिष्ट प्रकारापासून दूर रहावे. रवि, शनि, शुक्र या तीन बलवान ग्रहांच्या प्रभावामुळे काही अशक्मयप्राय गोष्टी साध्य होतील. नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास बरीच मोठी कामे होतील. उष्णता व पित्त विकारापासून जपा.
सिंह
मंगळाचे भ्रमण शुभ नाही. त्यामुळे खर्च, गुप्तशत्रू आणि रागावर नियंत्रण ठेवा. कर्ज प्रकरणे असतील तर ती जपून हाताळा. राशीस्वामी बलवान असल्याने नावलौकिक होईल. राजकारणाची आवड असेल तर त्यात यश मिळेल. दशमस्य शुक्रामुळे थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. अपेक्षेपेक्षाही जास्त फायदा होईल. एखाद्या क्षेत्रात मोठा अधिकार मिळण्याची शक्मयता. राहूकृपेमुळे मानाची नोकरी मिळेल.
कन्या
राशीस्वामी बुध अष्टमात आहे. धनलाभाच्या बाबतीत अनुकूल योग. काही गंभीर प्रसंग आल्यास बुध ग्रहाचा जप आवश्यक करा. भाग्यस्थ शुक्रामुळे विद्याव्यासंग वाढेल. उच्चशिक्षण घेण्याची हौस पूर्ण होईल. समाजाला उपयोगी पडणारी कामे तुमच्या हातून होतील. रवि-हर्षल योगामुळे काही विचित्र प्रसंग घडून लोक दुरावतील. त्यासाठी स्पष्टवक्तेपणा टाळा.
तूळ
पंचमात आलेल्या मंगळामुळे कुटुंबियांशी मतभेद होतील. तरुण-तरुणींनी चुकीच्या प्रेमपाशात अडकून नुकसान करून घेऊ नये. अष्टमातील शुक्र धनलाभाच्या बाबतीत अनुकूल आहे. भरभराट, समृद्धी या दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. रवि-शनि केंद्रयोग नोकरी, व्यवसाय आणि कोर्ट प्रकरणात अनपेक्षित महत्त्वाच्या घडामोडी घडविल.
वृश्चिक
राशीस्वामी मंगळ निष्प्रभ असल्याने कामाचा वेग वाढवावा लागेल. विलंब झाला तरी यश नक्की मिळेल. शनि-गुरुचे भ्रमण कमाईचे अनेक मार्ग दाखवून देईल. सप्तमातील शुक्रामुळे विवाहकार्ये मार्गस्थ होतील. भागीदारी व्यवसाय असेल तर मोठा फायदा होईल, पण विलासीवृत्ती, ऐषआराम व नको त्या वस्तुंची खरेदी यावर नियंत्रण ठेवावे लागेल. या आठवडय़ात मृत्युंजय जप करा.
धनु
राशीस्वामी गुरु, शनिने युक्त आहे, त्यामुळे जीवनाला आर्थिक स्थैर्य लाभेल. नव्या नोकरीच्या प्रयत्नात असल्यास त्यात उत्तम यश. रवि, हर्षल योग परदेश प्रवासाची संधी आणेल. मंगळ संततीच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडविल. कोणतेही काम अविचाराने करू नका. विमा अथवा तत्सम मार्गाने काहीतरी लाभ होतील. चंद, केतू योगामुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
मकर
मंगळामुळे कौटुंबिक जीवनात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. क्वचित राहती वास्तू बदलावी लागेल. इस्टेट अथवा संपत्ती बाबतीत काळजी घेणे आवश्यक. पंचमातील शुक्रामुळे कलाकौशल्य, संगीत, गायन वादन, चित्रपट क्षेत्र यात यश मिळू शकेल. आर्थिक समस्या मिटतील. कालसर्प योगात ग्रहमान अडकलेले आहे, कोणाचे मन दुखवू नका. अन्यथा होणारी कामेही फिसकटतील.
कुंभ
प्रखर शापीत योगात रास अडकलेली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवतील. शुक्राचे भ्रमण सर्व बाबतीत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी राहील. एकोपा वाढेल. जमिनींचे प्रश्न असतील तर ते सामोपचाराने मिटवा. रवि, बुध, हर्षल योगामुळे काही नवीन जबाबदाऱया पडतील, पण सारासार विचार करूनच निर्णय घ्या. एखादे चुकीचे केलेले काम नाटय़मयरित्या चांगले फळ देऊन जाईल.
मीन
काही चांगल्या गोष्टी अडगळीत पडलेल्या असतात पण वेळ आली की त्यांना सोन्याचा भाव येतो, या म्हणीनुसार या आठवडय़ात ज्या गोष्टी घडतील, त्या फायदेशीर ठरतील. रद्द झालेले प्रवास पुन्हा सुरू होण्याचे योग. लॉकडाऊनमुळे खोळंबलेली कामे होऊ लागतील. चांगल्या नोकऱयांच्या ऑफर्स येतील. लाभस्य गुरु शनिमुळे जागेचे व्यवहार लाभदायक ठरू शकतील. कालसर्प योगाचा प्रभाव आहे, त्यामुळे पूर्वजांची श्राद्धकर्मे व्यवस्थित ठेवा.
आनंद एस. मत्तीकोप कुलकर्णी
1812-1 ब, केळकर बाग, बेळगाव