बुध. दि.27 मे ते मंगळवार दि.2 जून 2020
हजारो वर्षापूर्वीच्या भारतीय परंपरा
पहिला भाग
अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर आंघोळी शिवाय कुणाला शिवायचे नसते कारण इन्फेक्शन प्रसार टाळण्यासाठी. चप्पल, बूट, सॉक्स घराबाहेर का ठेवायचे त्याचे कारणही हेच. घरात मृत्यू झाल्यावर 12 दिवस घरातून बाहेर पडत नसत, यालाच होमक्वारंटाईन म्हणावे का? कारण मृत्यूसमयी माणसाला काही ना काही आजार असतोच. या आजाराचा इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी 12 दिवस अंतर ठेवतात. बाळ-बाळंतीण स्त्रीला काही दिवस घरातच एका खोलीत क्वारंटाईन करतात. त्या खोलीच्या दाराला कडुलिंब तोरण बांधतात. लहान बाळाची प्रतिकार क्षमता कमी असते. बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून ही योजना केलेली असते. मयत झालेल्या घरात 12 दिवस अन्न शिजवत नाहीत. 12 व्या दिवशी घर स्वच्छ का करतात, या मागील कारणे हीच असतात. हल्लीच्या हायफाय मॉडर्न संस्कृतीला या गोष्टी पटत नाहीत. त्यांना हे सर्व थोतांड वाटते. स्त्राr विटाळशी असताना तिला शिवत नाहीत, कारण तिच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये, हा हेतू असतो. हल्ली कुणी शिवाशिव पाळत नाहीत. चप्पल, बूट, सॉक्स घालून सरळ घरात व ऑफिसात शिरतात. सोयरसूतक पाळत नाहीत. काही समाजात तीन दिवस सुतक पाळतात, पण हे योग्य नाही. या साऱयामागे वैज्ञानिक कारणे आहेत. ही अंधश्रद्धा नाही हे लोकांनी ओळखले पाहिजे. हजारो वर्षापूर्वी जाणत्या ऋषीमुनींनी हे जे नियम तयार केले आहेत, तेच नियम आज संपूर्ण जगात पाळले जात आहेत. स्वच्छता, पावित्र्य, सामाजिक अंतर, उष्टे न खाणे, एकाच ताटात एकावेळी अनेकांनी जेवण न करणे, या साऱया बाबी हिंदू धर्मात पूर्वीच सांगितलेल्या आहेत. कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी स्नानाने शुचिर्भूत झाल्यावर ‘अपवित्रो वा पवित्रो भवती’ असे म्हणून सर्व साहित्यावर पाणी शिंपडून ते शुद्ध करतात. कारण शुभकार्यात कोणतीही बाधा अथवा वाईट शक्तीचा संपर्क होऊ नये, हा त्याचा हेतू असतो. घरात उद, कापूर, धूप फिरवणे यामागील हेतू काय, लग्नाआधी हळद का लावतात, यामागील लॉजिक काय आहे? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात.
मेष :
सध्या गुरु व शुक्र दोन्ही शुभ ग्रह वक्री आहेत. या काळात पूर्वीच्या बंद पडलेल्या अथवा रेंगाळलेल्या महत्त्वाचा कामांना सुरुवात करावी. शुक्र भ्रमण, आर्थिकदृष्टय़ा, अत्युत्तम असल्याने सतत पैसा मिळत राहील, पण खर्चालाही धरबंध राहणार नाही. फालतू बाबीसाठी बराच खर्च कराल. संततीशी मतभेद होऊ शकतील, काळजी घ्या.
वृषभ :
भाग्यात गुरु व राशीत शुक्र दोन्हीही वक्री आहेत. राशीस्वामी शुक्र बलवान आहे. एखाद्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग मिळेल. आर्थिकस्थिती सुधारेल. गेले वर्षभर झालेले काही त्रास कमी होतील पण शुक्र, गुरुच्या पावित्र्याला बाधा येईल, असे कृत्य करू नका अन्यथा त्याचे शुभ परिणाम दिसणार नाहीत.
मिथुन :
अष्टमात गुरु व बाराव्या स्थानी शुभ्र वक्री आहे. आर्थिक बाबतीत हा योग चांगला आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे काम करून घ्या. सध्या गुरुची शक्ती क्षीण असल्याने प्रत्येक कामात अडचणी उद्भवण्याची शक्मयता आहे. शुक्र शुभ फळ देण्यास समर्थ आहे, पण व्यसन, भांडणतंटे, गैरसमज वगैरेपासून दूर राहा, अन्यथा शुभ फळ मिळणार नाही.
कर्क :
सप्तमात गुरु व लाभात वक्री शुक्र, राजयोगाचा काळ सुरू आहे. सर्व तऱहेची आर्थिक कामे होऊ लागतील. वाडवडिलांची पूर्वपुण्याई चांगली असेल तर कल्पनाही केला नसाल असे यश मिळेल. कोरोना संक्रमण काळ सुरू असल्यामुळे सध्या प्रवास रहित करा. नवे वाहन घेण्याचा विचार तूर्ता लांबणीवर टाका. व्यसनापासून दूर रहा.
सिंह :
मृत्यूषडाष्टात वक्री गुरु हा योग आर्थिक बाबीसाठी चांगला, पण इतर बाबतीत शुभ मानला जात नाही. त्यामुळे कोणतेही काम प्रसंगावधान राखूनच करावे लागेल. नोकरी व्यवसाय, भाग्योदय व परदेश प्रवासाच्या बाबतीत अडलेली कामे करून घ्यावीत. गेल्या दोन महिन्यातील काम बंदमुळे आरोग्य व भाग्योदयात अडथळे येऊ शकतील. आपले म्हणणारेही पाठ फिरविण्याची शक्मयता.
कन्या :
पंचमातील वक्री शनि व गुरु काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ फळे देईल. पण भाग्यातील वक्री शुक्रामुळे फिसकटलेले मंगलकार्य पुन्हा जुळेल. तसेच गेलेली नोकरी परत मिळू शकेल. सुवर्णालंकार व वस्त्रप्रावरणाचा लाभ होईल. मंगल कार्याच्यादृष्टीने चांगले योग. मंगळ, शनि अशुभ योग. अपघात व गैरसमज पसरविणारा आहे. त्यामुळे या आठवडय़ात कलाटणी देणाऱया महत्त्वाच्या घटना घडतील.
तूळ :
राशीस्वामी शुक्र अष्टमात असलातरी शुभ आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत व चतुर्थांश शनि, गुरु वक्री असल्याने वास्तुविषयक कामे खोळंबतील. पण कर्जप्रकरणे, वाहनखरेदी महत्त्वाच्या वाटाघाटी यासह सर्वमहत्त्वाची कामे करून घ्यावीत. शनि, मंगळाचा अशुभ योग पडझड, अपयश तसेच काही बाबतीत अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे.
वृश्चिक :
सप्तमात वक्री शुक्र असल्याने सांसारिक मतभेद कमी होतील. तृतीयात गुरु व शनि वक्री असल्याने सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होतीलच असे नाही पण त्यामुळे नाउमेद न होता कोठे दोष आहेत हे पहावे. आगामी काही दिवसात तुम्हाला सर्वच बाबतीत चांगले दिवस येणार आहेत, पण मुलाबाळांच्या बाबतीत किरकोळ त्रास होण्याची शक्मयता आहे.
धनु :
धनस्थानी वक्री, शनि व गुरुची अनुकूलता आहे, तोपर्यंत महत्त्वाची सर्व कामे आटोपून घ्या. यश मिळेल. शनि, मंगळ अशुभ योग व कोरोनामुळे थंडावलेले व्यवहार यामुळे प्रत्येक कामात निरुत्साह जाणवेल. नातेवाईक व शेजारी यांच्याशी आर्थिक देवाणघेवाणीच्या काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नको तिथे अति उदारपणा दाखवू नका.
मकर :
राशीस्वामी शनि, गुरुच्या सान्निध्यात असून वक्री आहे. कुणाकडून मदत घेतला असाल तर त्याच्या संकटकाळात त्याला विसरणे ही फार मोठी घोडचूक ठरेल. वाहन जपून चालवावे. कुणाच्या प्रकरणात मध्यस्थी करू नका. महत्त्वाचे निर्णय चौकसबुद्धीनेच घ्या. काही कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. समझोता व चातुर्याने त्यावर मात करता येईल.
कुंभ :
गुरु व शनि हे दोन्ही ग्रह अनिष्टस्थानी वक्री आहेत. कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येणार नाही. एखाद्या कामासाठी काढून ठेवलेले पैसे दुसऱयाच कामासाठी खर्च व्हावेत, त्यामुळे महिन्याचे बजेट चुकावे असे ग्रहमान आहे. त्यामुळे या आठवडय़ात खर्च व कमाई यांचा ताळमेळ व्यवस्थित ठेवावा लागेल. नवीन कोणतेही प्रकल्प या काळात पूर्ण होणे कठीण आहे.
मीन :
लाभातील शनि व राशीस्वामी गुरु वक्री आहेत. काही भव्यदिव्य असे घडण्याची शक्मयता. हा काळ अतिशय चांगला असल्याने कोणतीही महत्त्वाची आर्थिक कामे करून घ्यावीत. शुक्र, केतूचे भ्रमण, सौख्यप्रद व धनलाभ घडविणारे आहे. प्रेमप्रकरणे व व्यसने यापासून दूर रहावे लागेल. घरातील वयस्कर व्यक्तींनी आरोग्य जपावे.