दिव्याची अमावास्या अत्यंत पावित्र्याने साजरी करा
बुध. दि. 15 ते 21 जुलै 2020
अमावास्या ही तिथी लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहे! ‘जेथे दिवा तेथे लक्ष्मी’ अशी म्हण आहे. म्हणूनच घरात सायंकाळी दिवे लावण्याची परंपरा आहे. येत्या 20 तारखेला आषाढी सोमवती अमावास्या आहे. यालाच दिव्याची किंवा दिवशी अमावास्या म्हणतात. या अमावस्येला केलेले दीपपूजन घराण्यातील अनेक दोष दूर करते. दीपावली लक्ष्मीपूजनाप्रमाणे या अमावास्येला दिव्यांची आरास करावी. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी व दिव्यांचा मंत्र सामूहिकरित्या म्हणावा. सर्वांचे कल्याण व्हावे, सर्व प्राणीमात्र सुखी रहावेत, कुणाच्याही मनात पापवासना अथवा शत्रुभावना राहू नये, अशी प्रार्थना करावी. लक्ष्मीला अभिषेक व कुंकुमार्चन करून लक्ष्मीला व दिव्याला पुरणाचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी लाहय़ांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी श्रद्धेने केलेले दीपपूजन एक वर्षापर्यंत शुभ फळ देते, व लक्ष्मीची कृपा होते. देशात काही प्रांतात हा दिवस दीपावलीप्रमाणेच साजरा करतात. त्या दिवशी सर्वत्र पावित्र्य ठेवले जाते. अदृश्य रुपाने या अमावास्येला दीपदेवताचा पृथ्वीतलावर वास असतो व जे कुणी दीपपूजन करतात यांना या देवतांचा आशीर्वाद लाभतो. दिक्याचे हजारो मंत्र आहेत, पण सर्वात सोपा व सर्वांना म्हणता येण्यासारखा मंत्र म्हणजे, ‘शुभं करोती कल्याणम… आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते’ हा आहे. अग्निपुराणात दिव्याचे अपरंपार महत्त्व दिलेले आहे. हल्ली सर्वत्र व्यसने वाढलेली आहेत. दिव्याच्या या लक्ष्मी अमावास्येला ‘गटारी अमावास्या’ म्हणून तिचा अपमान करू नका. ते फार वाईटरित्या बाधते. व्यसन वगैरे असेल, तर ते सोडा. सर्व कुटुंबांचे कल्याण होईल. आपल्या हातून कळत नकळत अनेक पापे व अक्षम्य अपराध होत असतात. कुणी मुद्दाम पाप करीत नसतात, पण परिस्थितीनुसार ही पाप घडत असतात. रस्त्यावर 500 रुपयांची नोट पडलेली असते, लोक ती उचलतात, ती काही चोरी म्हणता येणार नाही. पण ज्याचे पैसे हरवले, त्याचा शाप लागणारच. कुणाच्या तरी चुकीने गंभीर अपघात होतात, व पैसे वगैरे चारुन अथवा कायद्यातील पळवाटा हेरुन, कोर्टात अनेक जण निर्दोष सुटका करून घेतात. खोटे कागदपत्र करून अथवा धमकावून, इस्टेट अथवा संपत्ती लुबाडण्याचे प्रकारही होत असतात. काही जणांवर विशेषत: भगिनी वर्गावर खोटेनाटे आरोप येतात, जोपर्यंत यांची वेळ चांगली असते, तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालते, पण वेळ फिरली की, क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन जाते. गुन्हेगार अथवा अपराध्याला वाचविणाराही या शापाचा धनी बनतो. ‘जे कराल, ते भोगाल’ हा सृष्टीचा नियम आहे. आज ना उद्या अथवा पुढील पिढीला ती पापे नक्कीच फेडावी लागतात. यासाठी कुणावर अन्याय करू नये व चुकून झालाच असेल, तर दिव्याचे पूजन करून क्षमायाचना करावी. ज्याचे नुकसान झालेले असेल, त्याची नुकसान भरपाई त्याला देऊन त्याची क्षमा मागावी, तरच हे दोष जातात. शांती करून हे दोष जात नाहीत. आपल्या पूर्वजांच्या हातून कोणते अनिष्ट प्रकार घडलेले आहेत, ते आपल्याला माहीत नसते. यासाठीच आषाढी अमावास्येला दीपपूजन करायचे असते.
मेष
आषाढी अमावास्या पराक्रमस्थानी होत आहे. मानसिक चंचलता, अनारोग्य व ताणतणाव दूर करण्यास मदत करील. यांत्रिक उपकरणे, विजेच्या वस्तू सावधानतेने हाताळून कोणतेही काम करा. मोठी गुंतवणूक करताना त्यातील आकर्षक जाहिरातीला भुलू नका. महत्त्वाची खरेदी, वाटाघाटी, प्रवास व बोलणी करताना चार चौघा जाणकारांना बरोबर घ्या. म्हणजे फसवणुक होणार नाही.
वृषभ
दिव्यांची अमावास्या, धन व पराक्रमी स्थानी होत आहे. कोणतेही आर्थिक निर्णय विचार करून घ्या. लाभातील मंगळ, अनेक बाबतीत चांगले फळ देईल. मोठे यश देणारी कामे मिळतील. नवे स्नेहसंबंध मित्रमैत्रिणींचे सहकार्य, तसेच सर्व कामात मनाजोगते यश मिळवाल. धनलाभाच्या दृष्टीने ही अमावास्या विशेष चांगली नाही. त्यामुळे जरा सावधानतेने वागा.
मिथुन
सोमवती दिव्यांची अमावास्या तुमच्या राशीत होत आहे. पुनर्वसु नक्षत्र असलेल्यांनी जरा काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. बराच काळ रखडलेले अनेक प्रश्न सुटतील. घराण्यातील अनेक गुप्त बाबींचा छडा लागेल. काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतील. वस्तुविषयक पावित्र्य व मांगल्य राखा. वडीलधारी माणसांची मने न दुखवता कामे करून घ्या.
कर्क
दिव्याची अमावास्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कोणतेही शुभ व दैवी कार्य करणार असाल, तर त्यात यश मिळेल. देवधर्म व्यवस्थित असेल, तर दैवी चमत्काराचा अनुभव येईल. जीवनाला सुखी करणारा एखादा मित्र अथवा मैत्रीण भेटेल. मानसिक समाधान मिळेल. एखादी किमती वस्तू हरवली असेल, तर त्याचा पत्ता लागेल. सरकारी कामात अडथळे येत असतील, तर ती कामे पुढे ढकला.
सिंह
दिव्यांची अमावास्या लाभयोगात होत आहे. आरोग्याच्या तक्रारी व शत्रुभय असेल, तर ते दूर होईल. पण आरोग्याची काळजी घ्यावी. थट्टामस्करी करताना कुणाशी शत्रुत्व निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. किरकोळ कारणावरून चांगले असलेले संबंध बिघडवू देऊ नका. दीपपूजनाने अनेक समस्या सुटतील.
कन्या
दशमात होणारी दिव्याची अमावास्या, सामाजिक तसेच नोकरी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी घडवील. नोकरवर्गाशी मतभेदाची शक्मयता आहे. काही गैरसमज, शत्रुत्व यामुळे होणारी छळवणूक, भागीदारी, तसेच प्रवासात येणाऱया अडचणी असतील, तर त्यातून काही तरी मार्ग मिळेल.
तुळ
20 तारखेची दिव्याची अमावास्या भाग्यात आलेली आहे. मानसिक संभ्रम असेल, तर तो दूर होईल. घरदार व उद्योग, व्यवसाय याकडे विशेष लक्ष द्या. कुणाचे ऐकून करणीबाधेच्या प्रकारामागे लागू नका. आर्थिक व मानसिक समाधान हरवून बसाल. छुपे शत्रू, तुमचा उत्कर्ष सहन न होणारे अशा लोकांपासून चार हात दूर राहणे चांगले. वाहन, अपघात व सर्व तऱहेच्या बाधा यापासून जपा.
वृश्चिक
पंचमातील मंगळ व अष्टमातील अमावास्या, म्हणजे शापीत योगच समजावा. पूर्वजांचे दोष जागृत होणे, वास्तुदोष, किरकोळ आजारासाठी चुकीचे निदान व त्यासाठी मोठे खर्च उद्भवतील. कोरोनाची भीती घालून पैसे उकळण्याचा प्रयत्न होईल. विजेच्या धोक्मयापासून दूर रहा. विवाहात अडथळे येत असतील, तर तूर्तास प्रयत्न करू नका. कुलदेवतेची आराधना करा.
धनु
20 तारखेला सप्तमात होत असलेली दिव्यांची अमावास्या चांगली नाही. ‘मनी वसें ते स्वप्नी दिसे’ या म्हणीचा प्रत्यय येईल. वाईट स्वप्ने पडणे, पूर्वीच्या काही प्रकरणातून शत्रुपीडा, आरोग्यात बिघाड, आजूबाजूच्या लोकांचा त्रास होणे असे प्रकार घडतील. त्यासाठी दीपपूजन करून वास्तू शांत ठेवा. कोणतीही संकटे आली तरी त्यातून परस्पर मार्ग निघेल.
मकर
कुणाला मदत करायला जावे व नको ते प्रकरण होऊन त्यात अडकावे, असे प्रकार घेऊन ही अमावास्या आलेली आहे. पण बिघडलेल्या संबंधाना नवा उजाळा देणारी, तसेच ऐश्वर्य व धनलाभ यांचा संगम असल्याने सर्व बाबतीत शुभ आहे. मोठे गुंतवणूक केलेली असेल, तर ती काढून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे त्याचा फायदा होईल.
कुंभ
संशयी वृत्तीमुळे चांगली माणसे दुरावतात, तर कुणाला साधी मदत केली, तर तीच माणसे ऐनवेळी कुठेतरी उपयोगी पडतात. या सप्तमात तसा अनुभव येईल. व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा. दिव्याची अमावास्या पंचमात आहे. मुलाबाळांच्या बाबतीत काही तरी चांगले घडेल. काही जणांच्या बाबतीत ‘घरचे झाले थोडे, त्यातच व्याहय़ाने धाडले घोडे’ असा प्रकार घडेल. पण अडलेल्या कामांना गती मिळेल.
मीन
दिव्याची उद्याची दर्श अमावास्या काही बाबतीत नवे अनुभव देण्याची शक्यता आहे. घराण्यात जर सावकारी दोष असतील, तर त्यामुळे काही शापित दोष निर्माण होतात. त्यामुळे ऐनवेळी अडचणी येतात. त्यामुळे मानसिक समाधान लाभत नाही. किरकोळ बाबी प्रति÷sच्या करू नका. जर तुमची बाजू बरोबर असेल तर गेलेली नोकरी परत मिळेल. आर्थिक अडचणी भेडसावत असतील, तर त्या कमी होऊ लागतील.