भरघोस मते देऊन विजयीकरावे
प्रतिनिधी/ मडगाव
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेसने पाच मतदारसंघांत उमेदवार उभे केले असून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केले आहे. वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी वरील आवाहन केले. आम्ही जास्त ठिकाणी उमेदवार उभे केले नसले, तरी दिलेल्या उमेदवारांना समाजसेवेचा व काहींना पंचायतीचे पंच म्हणून चांगला अनुभव आहे. 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहणे ही खासियत या उमेदवारांमध्ये आहे, असे ते यावेळी म्हणाले.
बाणावलीतून पंच व माजी उपसरपंच मिनिन दि बांदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तीन वेळा वेगवेगळय़ा प्रभागांतून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. कार्यक्षम पंच म्हणून ते विख्यात असून वेगवेगळय़ा प्रभागांतून निवडणूक लढवूनही विजयी होणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीवासियांनी त्यांच्यामागे राहावे, असे आवाहन आलेमाव यांनी केले.
अशाच प्रकारे कोलवा मतदारसंघात वानिया बाप्तिस्ता या अन्य एक समाजसेवेचा चांगला अनुभव असलेल्या महिला उमेदवार आहेत. त्यांना चांगल्या मताधिक्मक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सरिता फर्नांडिस (कुडतरी), जयंत शिरोडकर (आगशी) व नरेश कोरगावकर (हरमल) हे अन्य उमेदवारही लोकांसाठी 24 तास उपलब्ध राहणाऱयांपैकी असल्याचे आलेमाव यांनी सांगितले.
वेळेअभावी जादा उमेदवार उतरविता आले नाहीत
आम्हाला वेळ मिळाला नसल्याने जादा उमेदवार उभे करणे शक्मय झाले नाही, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले. काही विरोधी उमेदवार कोळसा व रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित करत असून आपण व आपले उमेदवार मिनिन फर्नांडिस तसेच अन्य उमेदवार रेल्वेमार्ग दुपदरीकरण व कोळसा वाहतुकीला विरोध करत आलेले आहेत, असा दावा त्यांनी केला.