सुप्रियाताई सुळे यांनीच केले अभिनंदन,कार्याची दखल घेवून निवड
प्रतिनिधी/ सातारा
वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकारणात ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाऱया संमिद्राताई जाधव यांनी दिलेला पक्षासाठी वेळ, पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी केलेले कार्य यामुळेच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱयांच्या निवडी करण्यात आल्या. त्यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे जिह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणून संमिद्राताई जाधव यांच्याकडे पक्षाचे सर्वेसर्व्हा शरद पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह मान्यवरांनी जबाबदारी सोपवली होती. जिल्हाध्यक्षपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जिह्यात पक्ष तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत पोहचवला. रुजवला अन् वाढवला. महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेवून त्यांना मुळ प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी स्वतःला झोकून देवून कार्य केले. संमिद्राताई जाधव यांनी जेव्हा सत्ता नव्हती. तेव्हा तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही चुकीचे निर्णय घेतले. त्याही विरोधात आंदोलन करुन आवाज उठवला होता. तसेच उत्तरप्रदेशमध्ये वाढलेल्या महिला अत्याचारप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून निषेध नोदंवण्याचे आंदोलन त्यांनी केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱयांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काम केले आहे. गाव तेथे राष्ट्रवादी आणि घरातील प्रत्येक महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यंकर्ती बनवण्यासाठी त्यांनी अनमोल कार्य केले. केवळ व्यासपीठावर भाषणबाजी न करता प्रत्यक्ष तळागाळातील महिलांसाठी पवारसाहेबांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्य करत राहिल्या. ग्रामपंचायत सदस्यपदाचा अनुभव असल्याने त्यांनी गावोगावच्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी कार्य करत राहिल्या. त्यांच्या याच कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबाबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदींनी अभिनंदन केले. त्यांच्यानिवडीबाबत जिह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे