प्रतिनिधी / सातारा
केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधनाच्या दरामुळे जनता भरडली जात आहे. सर्वसामान्य जनता अगोदर कोरोनामुळे रडकुंडीला आली आहे. त्यातच पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढवले जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हे दर वाढवून जनतेला लुटण्याचे काम केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन पेट्रोल पंपावर येणाऱया वाहनधारकांना गुलाब फुल देवून गेले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संमिद्राताई जाधव, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे, अशोक जाधव, नाना इंदलकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, युवकचे तालुकाध्यक्ष तुषार गुरव, सागर पवार, सुनील भारती, जयश्री ताटे, शुभम साळुंखे, विकास अवघडे, बच्चू गायकवाड, अजित बर्गे, स्मिता देशमुख, नलिनी जाधव, सिमा जाधव, कुसूमताई भोसले, विजय कुंभार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी सरकारच धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, अशा घोषणा देत निषेध नोंदवला. यावेळी बोलताना तेजस शिंदे म्हणाले, आज कोरोनाचे संकट कोसळले आहे. जगात आर्थिक मंदी आली आहे. सामान्य माणूस भरडला जात आहे. जागतिक बाजारात प्रुड ऑईलची किमंत कमी असतानाही देशात इंधनाच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात होते तेव्हा 135 रुपये डॉलरमध्ये बॅरल भेटत होता. आज 40 रुपयाच्या खाली घसरली आहे. तरीही 80 रुपये दर केले जात आहेत. सामान्य जनतेवर अत्याचार करत आहेत. याच उत्तर भाजपा सरकारने द्यावे, किमत कमी करुन दिलासा द्यावा, आज तुम्ही पहात असाल भाजपा सरकारच्या कामगिरीमुळे आणि सामान्य जनतेला बाजूला ठेवल्यामुळे गैरसोय होत आहे. गेल्या महिन्यात 22 वेळा पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, असे सांगितले.