प्रतिनिधी/ सातारा
उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये 19 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचे पडसाद देशभर उमटले. साताऱयातही राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी सांगितले
यावेळी जाधव म्हणाल्या, देशात वाढत्या बलात्कार, अत्याचाराच्या घटनामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशासह महाराष्ट्रात अशा घटना घडु नये म्हणून केंद्र सरकारने ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत. या घटनांचे गांर्भीर्य ओळखून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या तरच पिडितेला न्याय मिळेल. अशी मागणी जिह्यातील सर्व तरूणी-महिला यांच्या वतीने करत आहे. देशातील पोलीस प्रशासन, तसेच महिला संबंधित विभागाने अशा घटना पुन्हा घडु नये म्हणून महिलांना योग्य ती सुरक्षा द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली. सातारा जिह्यातून 200 हून अधिक पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा उपक्रम राबवत आहोत. यावेळी युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, पुजा काळे, रागिनी अहिवळे, नलिनी जाधव, कुसुमताई भोसले, सुवर्णा पवार, उषा पाटील, रशिदा शेख, संजना जगदाळे उपस्थित होत्या.