आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कर्मचाऱयांचे निवेदन
वार्ताहर/ कराड
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कंत्राटी बेसवर काम करणाऱया नविन व जुन्या अधिकारी व कर्मचाऱयांच्या मानधनात मोठयाप्रमाणात तफावत आहे. त्यामुळे शासनाने अभियानांतर्गत काम करणाऱया सर्व अधिकारी व कर्मचाऱयांना समान मानधान द्या अशी मागणी उपजिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱयांनी केली आहे.
याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत 12 ते 13 वर्षांपासुन अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत.या अभियानांतर्गत नव्याने नेमणुक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचऱयांच्या तुलनेत जुन्या कर्मचाऱयांचे मानधन खुप कमी आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱयांना समान मानधन द्यावे तसेच वर्षानुवर्षे अल्प मानधनावर सेवा करणाऱया कर्मचाऱयांना सामाऊन घ्यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजशे टोपे म्ह्णाले की, कंत्राटी कर्मचाऱयांना सामाऊन घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱयांच्यात प्रतिनिधींचे व सरकारचे बोलने सुरू आहे. मात्र कर्मचाऱयांच्या मानधनाबाबत आपण सकारात्मक असुन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे राजेश टोपे यांनी सांगीतले.