प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय बायोगॅस विकास, खत व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्य व देशपातळीवर 1000 संयंत्रे बांधून प्रथम क्रमाक मिळवला. याबद्दल ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी समन्वयाने दिलेले उदिद्ष्ठ100 टक्के पूर्ण केल्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन केलेले. त्याबद्दल शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेतील कृषी समितीच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जि.प.सदस्य, जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी, गावपातळीवरील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे अभिनंदन करून तसा ठराव करण्यात आला.
कृषि समिती मासिक सभा उपाध्यक्ष तथा कृषी समितीचे अध्यक्ष सतिश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेबेक्सवरती ऑनलाईन पार पडली. या सभेस कृषि उपसंचालक भाग्यश्री पोवार, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, धोंडीराम वरपे, लतीफ शेख, कल्पना चौगुले, रुपाली कापले, जीवन पाटील आदी उपस्थित होते. तर सर्व तालुक्यामधील कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी हे सदर सभेस ऑनलाईन उपस्थित होते.
समितीच्या बैठकीत सन 2020-2022 साठी 2.52 कोटी सुधारीत वाढीव तरतुद करण्यात आली .त्यामधे 50 टक्के अनुदानावर ताडपत्री, स्प्रेपंपासाठी 20 लाख, इलेक्टीक मोटार-19 लाख, पाईप -44 लाख, कडबा कुट्टी 40 लाख, 40 पारंपारीक औजर, खोरे टिकाव, पाटी, पहारसाठी 94 लाख आदी प्रमुख थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी तरतुद करण्यात आली आहे. सन 2019 -2020 मधील 31 पूलै 2020 अखेर खरेदी केलेल्या लाभार्थ्यांनी खरेदी बिले पंचायत समिती स्तरावर सादर केली आहेत, अशा लाभार्थ्यांना 10 सप्टेंबर पर्यंत अनुदान रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालबन योजना प्रभावीपणे राबविणेसाठी जि. प. सदस्य पंचायत समिती सदस्य यांना कृषि अधिकारी यांनी माहिती देवून जास्तीत जास्त लाभाची निवड होण्यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.