ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता काँगेसचे खासदार राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून तीन टप्पे बाकी आहेत. त्यासाठी प्रचार आवश्यक आहे. मात्र, देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितील प्रचारसभा आणि रॅली काढणे लोकहिताचे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या यापुढील सर्व प्रचारसभा मी रद्द केल्या आहे. इतर पक्षांनीही कोरोनाचे भीषण संकट ओळखून निवडणूक कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.