नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय मालमत्ता विकल्याचा आरोप करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कोरोनाची परिस्थिती “चिंताजनक” होत असताना आणि लसीकरणाची गती मंद होत असताना, केंद्र सरकार मात्र राष्ट्रीय विमुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी सोशली मीडियाच्या माध्यमातून देशातील कोरोना स्थिती असेल किंवा वाढती बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्दयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील त्यांनी ट्विट करत मोदी सरकरावर निशाणा साधत म्हटले आहे की, कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुढच्या लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. पण, भारत सरकार विक्रीत व्यस्त असल्यानं कृपया आपली काळजी घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.
बुधवारी देखील राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होतो. त्यांनी म्हटले होते की, , ‘आधी इमान विकला आणि आता … यासोबत त्यांनी ‘#IndiaOnSale’ हा हॅशटॅग देखील दिला होता. त्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा रंगली होती.
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये ओणमपासून संसर्गाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, महाराष्ट्रातही करोनाची प्रकरणे वाढली आहेत. इतर राज्ये जिथे सक्रिय प्रकरणे जास्त आहेत त्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.