ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी एक ट्विट करत सांगितले की, आता देश अनलॉकच्या दिशेने प्रवास करत आहे. अशा वेळी अधिक सावधान राहण्याची गरज आहे.
पुढे ते म्हणाले की, देशात अनलॉक केले असले तरी कोरोना आपल्या सोबतच रहाणार आहे. त्यामूळे आपल्याला अधिक काळजी घेतली पाहिजे. तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे आणि सर्वांनी लवकरात लवकर लस टोचून घेतली पाहिजे. जो पर्यंत सर्वजण सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि लस घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
- वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
कोरोना महामारीमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कार्यकर्त्यांनाही वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले की, 19 जून रोजी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसेच कोठेही पोस्टर तथा होर्डिंग्ज लावू नयेत. तर उपलब्ध साधनांचा उपयोग करून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.