प्रतिनिधी/ रत्नागिरी
आरोग्य व्यवस्थेमधील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱयांच्या नोकरी भरतीबाबत ऍड. राकेश भाटकर यांनी पुढे येऊन उपाययोजना सूचवाव्यात, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. शक्य असलेल्या गोष्टींवर त्या बाबत शासनाने आठवडय़ात पालन करावे व इतर गोष्टींवरती पुढील सुनावणीच्या वेळी चर्चा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्थापनात अपुरे मनुष्यबळ असल्याने आरोग्य अधिकाऱयांची भरती करण्यासंदर्भात खलील वस्ता यांच्यावतीने ऍड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेला उत्तरादाखल शासनाने आपले म्हणणे सादर केले आहे. त्यामध्ये वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱयांच्या भरतीसंदर्भात जाहिरात देऊनही पात्र उमेदवार येत नसल्याने आपली हतबलता प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात मांडली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून खलील वस्ता यांच्यामार्फत शासनाचा हा दावा स्पष्टपणे खोडून काढला आहे. न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. वारंवार तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपाच्या पदांची जाहिरात दिल्याने पात्र उमेदवार आपल्या नोकरीची हमी नसल्याने अर्ज करत नाहीत. गेले 7 ते 8 वर्षे वैद्यकीय विभागांमध्ये परमनंट स्वरूपाची पदे भरली गेलेली नाहीत. तसेच रिक्त पदांची संख्याही भरपूर आहे, असे खलील वस्ता यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
या प्रकरणी 23 सप्टेंबर रोजी जनहित याचिकेची सुनावणी दिपांकर दत्ता व कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फर†िन्संगद्वारे खलील वस्ता यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर झाली. त्यावेळी शासनातर्फे अनेकवेळा जाहिरात देऊनही पात्र उमेदवार येत नसल्यामुळे आरोग्य अधिकाऱयांची संख्या पुरेशी नसल्याचे स्पष्ट केले व हतबलता मांडली. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी ऍड. राकेश भाटकर यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणाबाबत योग्य त्या उपाययोजना सूचवण्याची विनंती केली. तसेच शक्य असलेल्या उपाययोजनांवर शासनामार्फत एक आठवडय़ात कारवाई करण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. इतर उपाययोजनांबाबत पुढील सुनावणीदरम्यान विचार करता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
जाणकारांची मते जाणून उपाययोजना सादर करणार: ऍड. भाटकर
न्यायालयाने माझ्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या बाबत आपण जाणकारांकडून माहिती घेऊन योग्य त्या उपाययोजना येत्या आठवडाभरात शासनास सादर करेन व महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांच्या भरतीबाबत नक्कीच ठोस पावले उचलली जातील, अशी प्रतिक्रिया ऍड. राकेश भाटकर यांनी दिली. या संदर्भात पुढील सुनावणी येत्या 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.