मुंबई
देशामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट येऊन गेल्यानंतर स्थिती सुधारली असून विविध वस्तुंना मागणी वाढल्याचे दिसले आहे. सप्टेंबर तिमाहीत रिटेल स्टोअर्सना विक्रीत 46 टक्क्यांची वाढ नेंदवता आली आहे. हाच आकडा मार्च 2020 नंतर प्रभावीत झालेला पुरवठा व मॅन्युफॅक्चरिंग झाले नसल्याने मागील वर्षात सप्टेंबर तिमाहीत रिटेल स्टोअर्सची विक्री फक्त 6 टक्क्यांनी वाढली होती. देशातील 75 लाख रिटेल स्टोअर्सचे सेल्स ऑटोमेशन पाहणारी फर्म बिजोमच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती दिली आहे.
प्राप्त अहवालानुसार महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱया लाटेनंतर देशात ग्राहकांनी बऱयापैकी वस्तुंची मागणी नोंदवल्याने मोठय़ा प्रमाणात रिटेल विक्रेत्यांना याचा लाभ झाला. लॉकडाऊन काळातही मागणी चांगलीच राहिली होती. यामध्ये पॅकिंगमधील फूड, कमोडिटीज, अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तूंच्या श्रेणीत ग्राहकांकडून मागणीत वाढ राहिली होती. याने विक्री वाढण्यास मदत मिळाली आहे.