प्रतिनिधी / कुडाळ:
अधिकृत परवाना असलेले खडी, चिरे, वाळू व इमारत साहित्य घेऊन येणारे डंपर अशी वाहने रितसर कागदपत्रे असल्यास ती सोडण्यास पोलिसांकडून सहकार्य करावे, असे सांगून एखादे वाहन बेकायदेशीर असल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यास कोणतीच हरकत नाही. परंतु घरांची कामे किंवा शेतकरी गवत व शेती अवजारे घेऊन जाणारी वाहने थांबवू नयेत, अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हय़ात संचारबंदी असताना निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱया सर्व गावातील जनतेचे रक्षण करण्याच्यादृष्टीने संचारबंदी काळात चांगले काम निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱयांनी केल्याबद्दल बंगे व युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी मुळीक तसेच साळुंखे यांचे अभिनंदन