प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या भात पोसवणी सुरू आहे. याचबरोबर बटाटा, सोयाबिन, भुईमूग, रताळी काढणीस प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू झालेल्या रिपरिप पावसामुळे सर्वच कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. तसेच पूर्ण पोसवलेले भातपीक पावसामुळे पडत आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेल्या या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. याचबरोबर ढगाळ वातावरण आणि हवेतील गारव्यामुळे जनता वैतागली आहे. पावसाला जोर नाही. मात्र रिपरिप असल्यामुळे बाजारपेठेसह इतर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर फेरीवाल्यांना पावसाचा फटका बसत आहे. यामुळे सोयाबिन काढून मळणी करणे शेतकऱयांना कठीण जात आहे.
आता पावसाने उघडीप दिली तरच शिवारातील कामे करणे सोपे जाणार आहे. सध्या शेतकऱयांकडून भुईमूग, रताळी, बटाटा याची काढणी सुरू आहे. त्यामध्येही व्यत्यय निर्माण झाला आहे. बासमती व इतर भाते बऱयापैकी पोसवली आहेत. मात्र पावसामुळे भात भरण्याआधीच पडत आहे. त्यामुळे शेतकऱयांतून भीती व्यक्त होत आहे. यावषी पावसाने सुरुवातीपासूनच चांगली सुरुवात केली होती. या पावसामुळे सर्वच पिके जोमात होती. पिकांना जसा पाऊस हवा आहे तसा पाऊस होत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या या रिपरिप पावसामुळे पिकांचे नुकसान होणची भीती व्यक्त होत आहे.
पाऊस जाण्याची वाट आता शेतकऱयांना पहावी लागत आहे. या पावसामुळे काही पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. ऊन किंवा जोरदार पाऊस आला तरच ही कीड जाणार आहे. अन्यथा किडीचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
सध्या कोरोनामुळे जनता तणावाखाली आहे. त्यातच ऊन, पाऊस आणि दमट हवामान यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्दी, ताप, खोक असे आजार वाढले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे जनता तणावाखाली असतानाच या दमट हवामानामुळे इतर साथीचे आजार वाढत आहेत.