वृत्तसंस्था /मुंबई :
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचे सत्र राहिले होते. परंतु सदर घसरणीला विराम देत पुन्हा चौथ्या सत्रात गुरुवारी मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांच्या जोरावर पुन्हा तेजी नोंद करुन बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेन्स 369 अंकाची तेजी नोंदवत बंद झाला आहे. सरकारकडून अर्थव्यवस्थेला समर्थन मिळण्याच्या संकेतामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 268.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,140.47 वर बंद झाला असून दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.85 अंकांनी तेजी प्राप्त करीत निर्देशांक 11,215.48 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग जवळपास तीन टक्मक्मयांनी वधारुन 2,060.65 रुपयावर पोहोचत नवीन विक्रमाची नोंद केली आहे. तर भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, आयटीसी आणि कोटक बँक यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, टाटा कंसल्टन्सी सर्व्हीसेज आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
भारतीय बाजारात प्रारंभीच्या काळात प्रमुख समभागाचा कल सकारात्मकतेकडे राहिला होता. परंतु आशियातील बाजारांनी मिळताझुळता कल दाखविला आहे. परंतु अमेरिका आणि चीन तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावध भुमिका घेतल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. तर भारतामधील पुनर्निमाणला प्रोत्साहन मिळण्यासाठी पाच क्षेत्राना उत्पादनासोबत जोण्यावर विचार केला जात असून या घटनेचा बाजाराला सावरण्यास मदत झाली आहे. अन्य आशियाई बाजारांमध्ये चीनचा शंघाय कम्पोजिट, दक्षिण कोराचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे नुकसानीत राहिले आहेत.