सेन्सेक्स 466 अंकांनी वधारला : भारत-चीन संघर्ष निवळल्याचा प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
मागील आठवडय़ातील शेवटचे तीन दिवस शेअर बाजारात तेजीचा माहोल राहिला होता. तेच वातावरण चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशीच्या सत्रात पहावयास मिळाले आहे. यामध्ये जागतिक सकारात्मक संकेतानुसार भारत आणि चीन यांच्यातील सीमा संघर्ष निवळण्याच्या कारणाचा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
सलगच्या चौथ्या सत्राच्या तेजीसोबत सोमवारी सेन्सेक्स दिवसअखेर 466 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. यामध्ये दिग्गज कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांचे मुख्य योगदान राहिले आहे. दिवसभरात सेन्सेक्सने 36,661.66 चा टप्पा पार केला होता. बंद होताना सेन्सेक्स 465.86 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,487.28 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 156.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,763.35 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सर्वाधिक 7 टक्क्मयांपेक्षा अधिक तेजीत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा फायनान्सचे समभाग राहिले होते. सोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टील यांचे समभागही नफ्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग लाल निशाण्यावर बंद झाले आहेत.
सेन्सेक्सला तेजी नोंदवण्यासाठी देशातील घडामोडीसोबत अन्य घटनांचाही प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यात भारत-चीन यांच्यातील सीमा संघर्षाचा तणाव निवळल्याचे संकेत मिळाले असून विदेश मंत्रालयाच्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा सकारात्मक प्रभाव भारतीय शेअर बाजारावर पडला असून बाजार मजबूत झाला आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोविड 19 वर लवकरच लस बाजारात आणण्याची सुरु असणारी तयारी या घटनेचाही प्रभाव सेन्सेक्सचा उत्साह वाढविण्यास कारणीभूत ठरला असल्याचे बोलले जात आहे.