प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलशुद्धीकरण प्रकल्पातील टाक्मया धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी वाया जाते. यामुळे पाणीपुरवठा मंडळाने पंचवीस लाखाचा निधी खर्च करून रिसायकल प्लँट निर्माण केला आहे. काही प्रमाणात पाणी वाया जात असल्याने रिसायकल करून पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष्मी टेकडी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. दररोज 18 एमजीडी पाण्यावर प्रक्रिया करून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. पण जलशुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर टाकीमध्ये मोठय़ा प्रमाणात मातीचा गाळ साचून रहातो. तसेच दूषित पाणी साचून रहाते. त्यामुळे चोवीस तासात तीनवेळा टाक्मया धुण्यात येतात. यामुळे दररोज शेकडो लीटर पाणी वाया जाते. सदर पाणी अरगन तलावात किंवा गटारीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करता येत नाही. पाण्यामध्ये मातीचा गाळ असल्याने याचा वापर कोणत्याच कारणासाठी करता येत नाही. पण सदर पाणी टाकीमध्ये साठवून ठेवल्यानंतर गाळ तळाला साचून रहातो. त्यानंतर पाण्याचा पुनर्वापर करता येवू शकतो. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्याच्यादृष्टीने पाणीपुरवठा मंडळाने लक्ष्मी टेकडी येथे रिसायकलिंग प्लँट निर्माण केले आहे.
त्याठिकाणी तीन पाण्याच्या टाक्मया बांधण्यात आल्या असून शुद्धीकरण प्रकल्पाच्या टाक्मया धुतल्यानंतर गाळयुक्त पाणी रिसायकलिंग
प्लँटच्या एका टाकीत साठविण्यात येते. सदर टाकीमध्ये गाळ खाली बसल्यानंतर स्वच्छ पाणी दुसऱया टाकीमध्ये जाते. त्यानंतर तिसऱया टाकीमध्ये गेल्यानंतर पंपाद्वारे सदर पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. त्याठिकाणी पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून पाण्याचा वापर केला जातो. या प्रकल्पाची उभारणी प्रकल्पाचा वापर पूर्णक्षमतेने केला जात आहे. यापूर्वी गाळयुक्त पाणी गटारीद्वारे सोडण्यात येत होते. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात होते. मात्र रिसायकल प्लँटच्या माध्यमातून गाळयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.