प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात गरीब व निराधार नागरिकांना अन्न मिळत नसल्यामुळे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी काही सेवाभावी नागरिक पुढे येत आहेत. कडोलकर गल्ली येथील बालाजी हार्डवेअर दुकानाचे संचालक रुद्रप्पा चंदरगी यांनी या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरिबांना धान्यवाटप केले.
त्यांनी कुमारस्वामी ले-आऊट परिसरात या धान्याचे वाटप केले. शंभराहून अधिक कुटुंबांना हे साहित्य पोचविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून आभार मानण्यात येत होते. धान्यवाटपावेळी व्ही. व्ही. पट्टणशेट्टी, महादेव होंगल, यल्लाप्पा पाटील यासह इतर उपस्थित होते.