ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिर्झव्ह बँकेकडून आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही, तो 4 टक्केच राहील. तर रिव्हर्स रेपो रेटही 3.35 टक्के राहणार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.
2 जून पासून सुरु असलेली रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज संपली. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना शक्तीकांत दास म्हणाले, वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीने धोरणात्मक दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पतधोरणाच्या पुनरावलोकनाचे लक्ष आर्थिक वाढीवर आहे. रिव्हर्स रेपो रेटही 3.35 टक्के स्थिर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक दरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो 4.25 टक्के आहे.
कोरोनाची साथ, पीएमआयची आकडेवारी, साथीच्या काळात कंपन्या कशा काम करतात आणि पावसाची अपेक्षा या सर्व बाबी लक्षात घेऊन आरबीआयने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाच्या प्रत्यक्ष जीडीपीमध्ये 9.5 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत ते 18.5 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.6 टक्के असेल, असेही दास म्हणाले.