ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिर्झव्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची 4 ऑगस्टला सुरू झालेली बैठक आज संपली. एप्रिल आणि मे दरम्यान देशाच्या अनेक भागात कोरोनाचे कडक निर्बंध असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. व्याजदरही निश्चित करण्यात आले आहेत. RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो चार टक्क्यांवर कायम आहे. त्यामुळे ईएमआय किंवा कर्जाच्या व्याजदरावर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दास म्हणाले, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा (MSF) दरही 4.25 टक्क्यांवर स्थिर आहे. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के स्थिर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक दरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो 4.25 टक्के आहे. मध्यवर्ती बँकेने आर्थिक भूमिका “उदार” ठेवली आहे. सहापैकी पाच सदस्यांनी उदारमतवादी भूमिकेवर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे भारतीय रिर्झव्ह बँकेने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाच्या वास्तविक जीडीपीमध्ये 9.5 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत तो 21.4 टक्के असेल, दुसऱ्या तिमाहीत 7.3 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.1 टक्के असेल.
2022-23 या आर्थिक वर्षात देशाचा वास्तविक जीडीपी दर 17.2 टक्के असू शकतो, असेही दास म्हणाले.