ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिर्झव्ह बँकेने आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. सलग नऊ वेळा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ज्यात रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ईएमआय किंवा कर्जाच्या व्याजदरावर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दास म्हणाले, ओमिक्रॉनमुळे नव्याने उभं राहिलेलं संकट आणि महागाईचा वाढता आलेख याबाबत चिंता व्यक्त करत आज रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही. सलग नऊ वेळा व्याजदर स्थिर ठेवले आहेत. रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगासमोर नवं संकट उभं राहील आहे. याचा प्रभाव आज पतधोरणावर दिसून आला. बाजारातील रोकड तरलता सुरळीत सुरु राहील याकडे विशेष लक्ष आहे.
दरम्यान, देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 9.5 टक्क्यांवर तर महागाई दर 5.3 टक्के राहील, असा अंदाज असल्याचेही दास यांनी सांगितले.