ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिर्झव्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष 2022 साठीच्या पहिल्या पतधोरणात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. पतधोरणात रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम आहे. बँकेने पुढील काळासाठी आपली अगम्य भूमिका कायम ठेवली आहे. रिव्हर्स रेपो रेटही कायम असून, तो 3.35 टक्के राखला गेला आहे.
भारतीय रिर्झव्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची 5 एप्रिलपासून सुरू झालेली बैठक आज संपली. त्यानंतर बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेत समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
दास म्हणाले, कोरोना विषाणूंच्या साथीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडून केल्या जाणाऱ्या घोषणा महत्त्वाच्या असतात. 2021-22 या आर्थिक वर्षातील ही पहिली एमपीसी बैठक आहे. रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी धोरणात्मक दरात शेवटची सुधारणा करण्यात आली होती. फेब्रुवारीत महागाई दर 5 टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील. सध्या देशात लसीकरणाला वेग आला असून, हळूहळू अर्थव्यवस्थेतही सुधारणा दिसून येतील.
दास यांनी भारताच्या जीडीपीचाही अंदाज दिला असून, 2021-22 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 10.5 टक्क्यांवर जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.