ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेता केंद्र सरकारने ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना हे इंजेक्शन देण्यात येते. दैनंदिन रुग्णसंख्या 1.50 लाखांच्या वर पोहचल्याने देशात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात इंजेक्शनची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
देशातील कोरोना परिस्थिती सुधारेपर्यंत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन आणि रेमडेसिवीर औषध सामग्री निर्यात करण्यावर बंदी असणार आहे.