ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
खराब हवामान आणि काही तांत्रिक कारणांसाठी भारतीय रेल्वेने आज 500 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाडय़ांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी आणि खराब हवामानामुळे भारतभरातील 352 रेल्वेगाडय़ा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर 161 रेल्वेगाडय़ा काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये पॅसेंजर एक्सप्रेस आणि काही स्पेशल गाडय़ांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांची आज गैरसोय होणार आहे.
त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत साईटवर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.