ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रेल्वेतील विविध पदांसाठी 1.4 लाख जागा भरणार आहेत. यासाठी एकूण 2 कोटी 44 लाख जणांनी अर्ज केला आहे. आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. परीक्षेआधी परीक्षार्थींना कोविड टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे.
त्याचसोबत मास्कचा वापरही बंधनकारक असणार आहे. तीन टप्प्यात ही भरती प्रक्रिया होणार आहे. मंत्रालयासाठी दिलेल्या उमेदवारांची 15 ते 18 डिसेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात कम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल. तर दुसऱ्या टप्प्यात नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगीरीची परीक्षा होईल. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2021 मध्ये होणार आहे.
दरम्यान, नव्या वर्षात एक जानेवारीपासून रेल्वे रुळावर आणू असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
31 डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली होती.