संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना कोविड टेस्ट करूनच आता यावे लागत असल्याने जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांचा ओघ कमी झाला आहे. शुक्रवारी एका दिवसात फक्त 360 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले. मात्र आता गणेशोत्सवासाठी खास रेल्वे सुरू होत असल्याने रेल्वेने किती चाकरमानी येतात, याची उत्सुकता आहे. रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. या तपासणीत कोरोनाची लक्षणे दिसणाऱया व्यक्तींना कोविडच्या तपासणीसाठी पाठविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी येथे दिली.
गणेशोत्सव कालावधीत कोकणात मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी येतात. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने यामार्गे वाहतूक बंद होती. मात्र रेल्वेकडून कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाडय़ांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत 162 गाडय़ा ये-जा करणार असल्याची घोषणा करण्यात येऊन कोकण रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांकडे लक्ष लागून राहिले आहे.
रेल्वे स्थानकावर तपासणी पथके
रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांबाबत शासनाकडून कोणतीही स्वतंत्र नियमावली लागू करण्यात आलेली नाही. परंतु, यापूर्वी जी नियमावली लागू केलेली आहे, तीच नियमावली रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांसाठी लागू असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांसाठी आगमनाच्या 48 तास अगोदर कोविडची चाचणी करून यावे लागणार आहे आणि हा चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक राहणार आहे. तसेच तीन दिवस क्वारंटाईन राहवे लागणार आहे. कोविड चाचणी न करता चाकरमानी आले, तर त्यांना दहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. रेल्वेने येणाऱया सर्व प्रवाशांची तपासणी होणार असून त्यासाठी महसूल, पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त पथके प्रत्येक रेल्वे स्थानकावर नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत येणाऱया प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्राथमिक आरोग्य तपासणी होणार असून ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना कोविड तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.
रेल्वे सुटतानाही संपूर्ण रेल्वे निर्जंतुकीकरण करूनच येणार आहेत. सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून आरोग्य यंत्रणा त्यासाठी दक्ष आहे. तसेच चाकरमान्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची खबरदारी घ्यावी. कोरोनाची लक्षणे असल्यास चाकरमान्यांनी स्वत: पुढे येऊन माहिती द्यावी व कोरोना तपासणी करून घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.