कपिलेश्वर रोडवरील गटार बांधकामास प्रारंभ : रुंदी आताच वाढविल्यास पाण्याचा निचरा होणे शक्य
प्रतिनिधी /बेळगाव
कपिलेश्वर रोडवर उड्डाणपुलाची उभारणी झाल्यापासून भांदुर गल्ली व ताशिलदार गल्लीतील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाळय़ात येथील घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे कपिलेश्वर रोडवर उड्डाणपुलाशेजारी गटारी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे मार्गाखालील गटारी मोठय़ा आकाराच्या करण्यात याव्यात, तसेच हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
कपिलेश्वर रोडवरील उड्डाणपुलाच्या उभारणीस विरोध करण्यात आला होता. पण प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली होती. पण यामुळे परिसरातील सांडपाण्याचा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. प्रत्येक पावसाळय़ात ताशिलदार गल्ली आणि भांदुर गल्ली परिसरात पावसाचे पाणी साचत असून पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होत आहे. उड्डाणपुलाची उभारणी केल्यापासून पावसाच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी बनली आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
याची दखल घेऊन कपिलेश्वर रोडवर उड्डाणपुलाशेजारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याची शक्मयता आहे. पण रेल्वे मार्गाखाली भुयारी गटार बांधण्याऐवजी यापूर्वी गोल पाईप घालण्यात आल्या आहेत. पण या पाईपमध्ये कचरा साचत असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. रेल्वे मार्गादरम्यानच्या पाईपमधील कचरा काढण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने केला असता, रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांकडून हरकत घेतली जाते. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. यापूर्वी रेल्वे मार्गादरम्यान पाणी जाण्यासाठी ठिकठिकाणी गटारी बांधण्यात आल्या होत्या. रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज करताना गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण शहराची व्याप्ती वाढल्याने गटारी व नाल्यांमधून वाहणाऱया सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण रेल्वे मार्गावरील गटारी तितक्मयाच आहेत. गटारीची रुंदी वाढविण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये याकरिता कपिलेश्वर रोडवरील रेल्वे मार्गादरम्यान गटारीची रुंदी आताच वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सध्या गटार बांधकाम करण्यात येत असल्याने गटारीची रुंदी वाढविणे शक्मय आहे. त्यामुळे मनपा अधिकारी व रेल्वे अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन रेल्वे मार्गादरम्यान गटारीची रुंदी वाढवून गटारीचे बांधकाम करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.