प्रतिनिधी / नांद्रे
पुणे – मिरज या मागावर रेल्वे दुहेरिकरण व विद्युतीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आसून येत्या काही महिन्यात हे काम पुण करण्याचे रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. माञ नांद्रे खोतवाडी ग्रेट क्र.121 हे कायमस्वरूपी बंद करूण रेल्वे प्रशासनाने येथील शेतकऱ्यांवर अनेक संकटे निमाण केले आहेत.
या बाबत रेल्वे प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आसताना हा रस्ता बंद करून येथील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसाण केले आहे. असे मत येथील शेतकरी व्यक्त करत असून तात्काळ रेल्वे प्रशासनाने यावर माग काढावा अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.