प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर मोठय़ा प्रमाणात होत असून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. रेल्वेस्थानक परिसर तसेच रेल्वे प्रवासादरम्यान मास्कचा वापर न करणाऱया प्रवाशांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. शनिवार दि. 17 पासून ही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने पसरू लागला आहे. याला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली लागू करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी मास्कचा वापर करत नसल्याचे रेल्वे विभागाच्या निदर्शनास आले असल्यानेच मास्कची सक्ती करण्यात आली आहे. दररोज हजारो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात. यामध्ये संसर्गाचा धोका सर्वाधिक असल्याने सुरक्षितता बाळगली नाही तर संसर्ग मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
रेल्वेस्थानकांवरील होणारी गर्दी आटोक्मयात आणण्यासाठी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफार्म तिकिटाचा दर वाढविण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांसोबत रेल्वेस्थानकावर जाणाऱया नागरिकांची संख्या आटोक्मयात राहणार आहे. याच सोबत रेल्वे विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने रेल्वेस्थानक तसेच रेल्वे प्रवासासाठी उपाययोजना केल्या आहेत.