वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय रेल्वे मागील वर्षी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीपासून नुकसानीचा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या एक वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे प्रवासी सेवेमधून 38,017 कोटी रुपयांचे नुकसान झाले. परंतु विशेष श्रमिक रेल्वे, अत्यावश्यक सामग्रीची देशभरातील राज्यांमध्ये वाहतूक करण्यासाठी चालविण्यात आलेल्या रेल्वे फेऱयांमुळे रेल्वेला आपले नुकसान भरुन काढण्याची संधी मिळाली असल्याची माहिती आहे.
सामान्यपातळीवर आजही रेल्वे सेवा सुरु करण्यात आलेली नाही, परंतु रेल्वेचे संपूर्ण लक्ष हे मालाची वाहतूक करण्याकडे राहिले आहे. 22 मार्चपर्यंत मागील एक वर्षामध्ये फक्त 1,868 कोटी रुपये मिळाले असून यात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. हाच काही प्रमाणात कोरोना संकटाच्या दरम्यान आधार मिळाला असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या प्रवासी सेवेत
71 टक्क्यांची घसरण रेल्वेला मागच्या आर्थिक वर्षात प्रवासी सेवेत 53,525.57 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु आर्थिक वर्षात आतापर्यंत 71.03 टक्क्यांच्या घसरणीसह 15,507.68 कोटी रुपयांची कमाई झाल्याचे स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्षामध्ये फेब्रुवारी 2021 पर्यंत रेल्वे प्रवासी सेवांमधून 12,409.49 कोटीची नफा कमाई केली होती. जी या अगोदरच्या आर्थिक वर्षात 48,809.40 कोटी रुपयावर राहिली होती.