जिल्हाधिकाऱयांना शेतकऱयांचे निवेदन, कोणत्याही परिस्थितीत रेल्वे मार्गासाठी जागा न देण्याचा निर्धार
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास, रिंगरोड, हलगा सांडपाणी प्रकल्प त्यानंतर आता शेतकऱयांच्या जीवावर रेल्वे महामार्ग उठला आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱयांना भूमीहीनच बनविण्याचा विडा केंद्र आणि राज्य सरकारने उचलला असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कोणत्याही परिस्थितीत आम्ही जागा देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी महिला शेतकऱयांनी अक्षरशः डोळय़ातून पाणी आणत आपली जमीन किती सुपीक आहे व आपणाला या जमिनीची किती गरज आहे. हे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही जमीन देणार नाही. तेव्हा रेल्वेमार्ग बदला, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या मार्गात देसूर, के. के. कोप्प, गर्लगुंजी, गजपती यासह इतर गावांतील शेतकऱयांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्या जमिनीवर अनेक वर्षे पिढय़ांपिढय़ा आम्ही जगत आलो आहे. आता रेल्वेमार्गात जमीन गेली तर जगायचे कसे? असा प्रश्न शेतकऱयांनी केला.
राजकीय व्यक्तींची एक इंचही जमीन या रस्त्यामध्ये गेली नाही याचे कारण काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
बेळगाव, देसूर, के. के. कोप्प, कित्तूर, धारवाड या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 73.2 कि.मी. आहे. 335 हेक्टर जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात भूमीहीन होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाजूला माळ जमीन असताना सुपीक जमिनीतूनच मार्ग काढण्यामागचा हेतू काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हय़ात सर्वात सुपीक जमीन ही नंदिहळ्ळी गावची आहे. नंदिहळ्ळीतील जवळपास निम्या शेतकऱयांची जमीन या रेल्वेमार्गामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर गर्लगुंजी, देसूर, नागेनट्टी, प्रभूनगर, अंकलगी, नागराळ, के. के. कोप्प या परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी जात असल्याने त्यांचा विरोध आहे. एकूणच सुपीक जमिनीतून मार्ग काढण्याऐवजी हाच मार्ग माळवट असलेल्या देसूर, यरमाळ, के. के. कोप्प येथून काढल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
यावेळी खासदार मंगला अंगडी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांची जवळपास 200 एकर जमीन आहे. मात्र त्यामधील एक इंचही जमीन जात नाही. त्यांची जमीन वाचविण्यासाठी इतर शेतकऱयांची जमीन घेण्यात आली आहे, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. कित्तूर चन्नम्मा चौकातून शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, शेतकरी संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, राजू पवार, प्रकाश नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, गर्लगुंजी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, संतोष पाटील, सुरेश चौगुला, नरेंद्र पाटील, प्रसाद पाटील, संतोष कुंभार, किरण कोडे, देवेंद्र पाटील, परशुराम जाधव, मारुती लोकूर, संतोष पाटील, पुंडलिक मेलगे, चेतन पाटील, वसंत नाईक, आप्पा जाधव, मंजु पुजारी, इरण्णा सोसालट्टी, मल्लप्पा अंगडी यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.