वार्ताहर / परळी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. एका बाजूने कोरोनाचे संकट आणि दुसऱ्या बाजूने परतीच्या पावसाचे संकट यामुळे सर्वचजण हतबल झाले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाची संततधार ही सुरुवात होती गुरुवारी काही उसंत घेतली असली तरीही परळी खोऱ्यात पावसाचा जोर हा तसाच होता.
शुक्रवारी पहाटे रेवंडे येथील घाटातील दरड पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेवंडे घाट हा धोकादायक स्थितीत असलेल्या पैकी एक घाट आहे अरुंद रस्ता नागमोडी वळणे रस्त्यावर असलेले महाकाय दगड यामुळे याठिकाणी डांबरी रस्ता होऊनदेखील बससेवा अजूनही सुरू नाही त्यातच दरड पडल्याने रेवांडे सह वरील गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे तरी संबंधितांनी लवकरात लवकर ही दरड हटवून रस्ता वाहतुकीस पूर्वपदावर आणावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.