प्रतिनिधी/ सातारा
सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रेशनिंगवरती गरीब कुटुंबाना धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते. आज जिह्यातील जवळपास 17 रेशनिंग दुकानदारावर आपल्या भरारी पथकाने कारवाई केली आहे की त्यांनी धान्य वाटपात अनियमितता केल्याचे आढळले. मात्र, जे लोक काळ्या बाजाराने धान्य घेतात त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रेशनिंगवरती गरीब कुटुंबाना धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते. आज जिह्यातील जवळपास 17 रेशनिंग दुकानदारावर आपल्या भरारी पथकाने कारवाई केली आहे की त्यांनी धान्य वाटपात अनियमितता केल्याचे आढळले. काही दुकानदाराने जे धान्य कमी वाटप करून दुसऱया व्यक्तींना जे विकले आहे, तरी ज्यांनी हे धान्य विकत घेतले, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई कारवाई करावी. कारण हे धान्य विकत घेणारे कोणी गरीब नसून त्यामागे कोण आहे हे शोधून काढून त्यांनाही कायदेशीर कारवाई करून अटक करावी. अशी मागणी शिवसेना सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे आणि उपशहर प्रमुख शिवाजीराव इंगवले यांनी केली आहे.