अन्न व नागरी पुरवठा खात्याची मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
रेशन पुरवठय़ात पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत मागील काही दिवसांपासून ई-केवायसीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन विकेंड कर्फ्यूमुळे हे काम लांबणीवर पडत आहे. जिल्हय़ातील 80 टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत रेशनपुरवठय़ात पारदर्शकता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ई-केवायसीबरोबर आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्यांना बीपीएल कार्डे परत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र बऱयाच जणांनी रेशनकार्डे परत केली नाहीत. अशांना खात्याने नोटीसा बजाविल्या आहेत. संबंधितांचे रेशनकार्ड बंद करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जावून ई-केवायसी करावी, असे सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे मागील वषी देखील ई-केवायसीचे काम थांबले होते. यंदा देखील ई-केवायसीचे काम लांबणीवर पडले आहे. मात्र खात्यामार्फत सातत्याने ई-केवायसीसाठी मुदतवाढ करून दिली जात आहे. मात्र काहीवेळेला सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ई-केवायसीचे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही.