प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र असला तरी अद्याप ग्रामीण भागात त्याबद्दल तितकीशी जागृती झालेली नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे सेवन या विषयीची माहिती नाही. त्यामुळेच लोकमान्य सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात जागृती करण्यात येत आहे. खानापूर तालुक्मयातील कणकुंबी परिसरातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे वाटप करून त्यांच्यामध्ये जागृती करण्यात आली.
बेळगाव येथील डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या आयुर्वेदिक रोगप्रतिकारक शक्तीवर्धक काढय़ाचे वाटप गावांमध्ये करण्यात आले. आमगाव, कणकुंबी, हुळंद या गावांमध्ये कार्यकर्त्यांनी औषधांचे वाटप केले. यावेळी बोलताना लोककल्पचे संचालक किरण गावडे म्हणाले, कोरोनामुळे तापाची साथ प्रत्येक गावागावात पसरली आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे. त्वरित औषधोपचार करून घेण्याचेही आवाहन त्यांनी गावकऱयांना केले. लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून इतर गावांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार आहे. यावेळी संजय वरंडेकर, लक्ष्मण गावडे, अनंत गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.