बेळगाव
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. भुकेलेल्याच्या मुखी अन्नाचा कण पडल्यास तो तृप्त होतो. यामुळे सर्व दानात अन्नदान शेष्ठच आहे. यामुळेच रोटी दिनाचे औचित्य साधून येथील सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये अन्नदान करण्यात आले. सिद्धार्थ बोर्डिंगला भेट देऊन विचारपूस करून रोटी-भाजी व इतर पदार्थ देण्यात आले. एक घास भुकेलेल्यांसाठी म्हणत मित्र परिवाराकडून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वैभव खाडे, हिरालाल चव्हाण, संतोष बोंगाळे उपस्थित होते. सिद्धार्थ बोर्डिंगमधील हिरेमठ मॅडम तसेच इतर सदस्य उपस्थित होते.