प्रतिनिधी /बेळगाव
रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या देशातील अग्रगण्य लोकमान्य ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटलचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद वैद्य बुधवार दि. 29 रोजी दक्षता हॉस्पिटल खानापूर रोड येथे येत आहेत. दुपारी 1.30 ते 3.30 यावेळेत ते रुग्णांची तपासणी करतील.
यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून 9595844844 किंवा 9552532092 या क्रमांकावर संपर्क साधावा. येताना एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआयचे रिपोर्ट घेऊन यावे, असे हॉस्पिटलने कळविले आहे.
गुडघे दुखीवरील सर्वोत्तम उपाय
‘रोबोटिक’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येते. गुडघ्यांच्या सांध्यामध्ये दोन हाडांवरील आवरण असलेल्या कुर्चेची झीज होऊन हाडांचे घर्षण होते. त्यामुळे तीव्र वेदना होतात. ही झीज औषधे, व्यायाम, तेल, मसाज, गुडघ्यातील इंजेक्शन यामुळे भरून येत नाही. अशावेळी शस्त्रक्रिया हाच उपाय राहतो.
शस्त्रक्रिया यशस्वी होतात का?
लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आजमितीला 20 हजारांहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. आता शस्त्रक्रियेत अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होवू लागला आहे. अत्यंत यशस्वी असे हे तंत्रज्ञान सर्जनला मदतीसाठी असल्याने शस्त्रक्रियेत अत्यंत अचुकता येते. गुडघ्याचा आलेला बाक जावून गुढघे सरळ होतात. केवळ खराब झालेल्या कुर्चा काढून कृत्रिम सांधेरोपण करता येते.
शस्त्रक्रियेनंतर मांडी घालता येते?
होय. शस्त्रक्रियेनंतर बहुतांश रुग्णांना मांडी घालता येवू शकते. साधारणतः शस्त्रक्रियेनंतर चार, पाच महिन्यानंतर डॉक्टर रुग्णांची हालचाल व स्थिती पाहून परवानगी देतात. भारतामध्ये बहुतांश लोकामध्ये मांडी घालून बसणे ही नित्य दैनंदिन क्रिया आहे. धार्मिक पूजाविधीसाठी मांडी घालणे आवश्यक असते. मुस्लीम बांधवांमध्ये नमाज हा खाली बसूनच केला जातो. ग्रामीण भागात जेवणासाठी ही क्रिया आवश्यक असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरही रुग्ण मांडी घालण्याचा आनंद मिळवू शकतात. काही रुग्णांसाठी मात्र ही क्रिया करणे हितावह नसते.
शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन कामे करता येतात का?
सर्वसाधारणतः शस्त्रक्रियेनंतर दुसऱयाच दिवशी चालवले जाते. शौचाला जाणे, जिने चढणे, उतरणे याचे ट्रेनिंग दिले की तिसऱया अथवा चौथ्या दिवशी घरीही सोडतात. महिन्याभरातच घरातील सर्व दैनंदिन कामेही करता येतात. अनेक रुग्ण शेतातील कामे, वाहन चालविणे या सारख्या गोष्टीही करतात.
मधुमेह, थायरॉईड, हृदयाजार अशा रुग्णांवर सर्जरी यशस्वी होते का?
या शस्त्रक्रियेसाठी बहुतांशी पूर्ण भूल द्यावी लागत नाही. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ही शस्त्रक्रिया केली जाते व नक्कीच फायदा होतो.
रोबोटिकच्या साहाय्याने शस्त्रक्रियेचे फायदे
अत्यंत अचुकता, नैसर्गिक रचनांचे जतन, त्वरित आराम, फास्ट रिकव्हरी, हालचालीत येणारी नैसर्गिक सहजता व सुलभता.