तब्बल 166 टक्के उद्दिष्टपूर्ती : वर्षभरात 35665 मजुरीचे दिवस भरवण्याचा उच्चांक : दीडपट अधिक रोजगार देऊन कोरोना संकटकाळात लोकांना दिला मोठा आधार
पिराजी कुऱहाडे / खानापूर
2020-21 या आर्थिक वर्षात मार्चअखेर लोंढा ग्राम पंचायतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तब्बल 166 टक्के मजुरीचे दिवस भरवून संपूर्ण खानापूर तालुक्मयात उच्चांक गाठला आहे. नरेगा योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या दीडपट मजुरीचे दिवस भरवून लेंढा ग्रामपंचायतीने तालुक्मयातील 51 ग्राम पंचायतीमध्ये प्रथमस्थानी राहण्याचा मान मिळवला आहे. खानापूर तालुक्मयातील 51 ग्राम पंचायतींना नरेगा अंतर्गत एकूण 11 लाख 60 हजार मजुरीचे दिवस भरण्याचे टार्गेट दिले होते. तालुक्मयाने या उद्दिष्ठाची पूर्तता करत तब्बल 12 लाख 19,718 मजुरीचे दिवस भरून जिल्हय़ामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामध्ये लोंढा ग्रामपंचायत अग्रेसर ठरली आहे.
लोंढा ग्रामपंचायतीला गेल्या आर्थिक वर्षामध्ये 21,439 मजुरीचे दिवस भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तरीही या ग्रामपंचायतीने दिलेल्या उद्दिष्टाच्या दीडपट म्हणजे 35,665 मजुरीचे दिवस भरून या भागातील लोकांना चांगला रोजगार मिळवून दिला आहे. लोंढा ग्रामपंचायतीने केलेल्या उद्दिष्टपूर्तीमध्ये संपूर्ण खानापूर तालुक्मयामध्ये दिलेल्या उद्दिष्टापेक्षा दीडपट अधिक रोजगार देऊन या भागातील लोकांना कोरोना महामारीच्या गंभीर संकट काळात मोठा आधार बनवला आहे. वर्षभरात मार्चअखेरपर्यंत ग्रामपंचायतीकडे 1691 जॉबकार्ड असून यामध्ये 769 सक्रिय कामगार आहेत. यामध्ये जवळपास 149 कुटुंबांना 150 पेक्षा अधिक दिवस रोजगार दिला आहे. या कामात 529 महिला कामगार तर 641 इतर वैयक्तिक कामगारांचा समावेश आहे. यानुसार ग्रामपंचायतीने 95 लाख 87 हजार रुपयाचा रोजगार या भागातील लोकांना दिला आहे.
ग्राम पंचायतीने बेरोजगाराना अधिक कामे देण्यासाठी सरकार या मार्गसुचीनुसार दिलेल्या उद्दिष्टांपेक्षाही अधिक 166 टक्के मानव दिन भरवून खानापूर तालुक्मयात लोंढा ग्रामपंचायतीने उच्चांक साधला असल्याची माहिती लोंढा ग्रामपंचायत समितीतर्फे मंगळवारी लोंढा येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत विकास अधिकारी बलराज बजंत्री यानी दिली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शेवरीन डायज, उपाध्यक्ष संदीप सोजा, सदस्य निळकंठ उसपकर, संतोष चितळे, कुमार पाटील, नवाज जुनेरी, समीर खान,उर्मिला मिठारी, रेष्मा फठान, संजना पालेकर, जयश्री नायक, वैशाली कांबळे, शांता खेडोरी, चिमना बानेकर, संध्या हंडी तसेच सेकेटरी विलास मांगलेकर उपस्थित होते.
नरेगा योजना बनले आधार
यावेळी अधिक माहिती देताना पंचायत समितीने सांगितले की, लेंढय़ात अलीकडच्या काळात कामधंदा नसल्याने अनेक कुटुंबांना चूल पेटवताना नाकी नऊ येत होती. कुंदील प्रकल्प बंद पडल्यानंतर अनेकांनी गाव सोडले. त्यामुळे शेकडो कुटुंबे बेरोजगार झाली. बेरोजगार तरुणांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो ही आशेचा किरण बनली. कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरचे आयुष्य जगणे त्रासदायक ठरल्याने लोंढा गावच्या तरुणांचा आधार बनला होता. येथील शंभराहून अधिक तरुण न्याहरी, चहा, कॉफी, वडा पाव तसेच पिण्याच्या पाण्यापासून मिठाई व फळांची विक्री करीत आपले जीवन जगत होते. हुबळी-धारवाड व बेळगावलाही प्रवास करत नोकऱया सांभाळत होते. परंतु लॉकडाऊन काळात रेल्वेवर परिणाम झाल्यामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. रोजगार नसल्याने स्वतःचे आणि त्यांच्यावर अवलंबितांचे जीवन जगणे अवघड बनल्याने त्यांना नरेगा योजना आधार बनले आहे.
आजी-माजी सदस्यांचे विशेष सहकार्य
तालुक्मयामध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी लोंढा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रामुख्याने जलशक्ती अभियान, राखीव जंगलातील कामे, अंतर्जल योजना राबवणे, नवीन तलावाची निर्मिती, नाले, कालवे दुरुस्ती, घरोघरी सांडपाणी निचराकुंड निर्मिती, सार्वजनिक कचराकुंडी निर्मिती यासह वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी चरी मारणे, सरकारी इमारतींच्या परिसरात झाडे लावून दुरुस्ती करणे, साफसफाई, कृषी तलाव, वन विभाग, खंदक बांधकाम, वृक्षारोपण व्यवस्थापन आदी कामे हाती घेण्यात आली. यासाठी गावकऱयांसह ता. पं. कार्यकारी अधिकारी तसेच आमदार निंबाळकर यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले
-बलराज बजंत्री-पीडीओ ग्राम पंचायत, लोंढा
सर्वांना विश्वासात घेतल्यानेच कार्य साध्य
कोविड 19 च्या काळात नरेगा प्रकल्प राबविण्यासाठी मागील ग्रामपंचायत समितीने प्रामुख्याने रोजगारावर भर दिला. त्याच धर्तीवर आता नवीन ग्रामपंचायत समितीनेही स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पीडीओ बलराज बजंत्री यांनी आजी-माजी ग्रामपंचायत समितीला विश्वासात घेऊन सदर कामे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न हाती घेतले म्हणूनच हे ध्येय साध्य ठरले.
-श्रीमती शेरविन डायज-ग्रा. पं. अध्यक्षा, लोंढा
कोरोनाकाळात नरेगा योजना फारच ठरली लाभदायी
लेंढा ग्रामपंचायत क्षेत्रात शेतीपूरक कामे फार कमी आहेत. पण लोंढा जंक्शनवर दैनंदिन उपजीविकेवर जगणारे अनेक लोक आहेत. पण जेव्हा कोरोना संकट काळामध्ये रेल्वेही थांबली. अन् रोजगारही थांबला. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशा गंभीर परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीची नरेगा योजना फारच लाभदायी ठरली आहे. त्यामुळे आज बऱयाच कुटुंबांना याचा लाभ झाला असून मागील ग्रामपंचायत समितीच्या हाती घेतलेल्या या कामाबरोबरच आता आपली नवीन ग्रा. पं. समितीही ग्रामपंचायतीची प्रगती साधण्यासाठी व विकासकामे राबविण्यासाठी कार्यतत्पर आहे.
-समीर खान-सदस्य ग्रा. पं., लोंढा
बेरोजगारांना आधार लोंढा ग्रामपंचायतीचा
तालुक्मयाच्या दक्षिण टोकावर असलेले लोंढा गाव एकेकाळचे आर्थिक उत्पन्न देणारे गाव म्हणून ओळखले जात होते. पण या भागातील कुंदील प्रकल्प बंद पडल्यानंतर बेरोजगार युवकांवर आर्थिक बेकारी आल्याने पर्यायी रोजगार म्हणून येथील जिल्हय़ातील एकमेव असलेल्या लोंढा जंक्शन आधार बनला होता. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर रेल्वेही बंद झाल्याने लोंढय़ातील बेराजगारांना केवळ आधार ठरली, ती म्हणजे ग्राम पंचायतीची महात्मा गांधी रोजगार हमी योजना होय.
-संतोष चितळे-ग्रा. पं. सदस्य, लोंढा