कोलंबोत लष्कर तैनात, कडेकोट बंदोबस्तात उघडली दुकाने
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेतील आर्थिक समस्या वाढत असताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शनिवारी राजधानी कोलंबोमध्ये लष्कराच्या तैनातीदरम्यान दुकाने उघडण्यात आली. लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येण्यासाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे.
श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून विविध समस्यांसह महागाईचा सामना करत आहे. कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर अनेक जीवनावश्यक वस्तूंची टंचाईही जाण्वू लागली आहे. आता येथे जीणेही अवघड झाल्यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करू लागले आहेत. त्यामुळे आता आणीबाणी घोषित केल्यानंतर, लष्कर संशयितांना चाचणीशिवाय अटक करू शकते. तसेच त्यांना दीर्घकाळ कोठडीत ठेवू शकते. राजपक्षे यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱया 11 पक्षांनी मंत्रिमंडळ बरखास्त करून अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यात अलीकडचे मंत्रिमंडळ अयशस्वी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भारताने पाठवले 40,000 टन डिझेल
इंधन संकटाशी लढा देत असलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने पाठवलेला तेल टँकर शनिवारी श्रीलंकेत पोहोचला आहे. हे इंधन वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यानंतर इंधनाच्या संकटाशी झगडणाऱया लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वास्तविक, भारताने श्रीलंकेला 1 अब्ज डॉलर्सची पेडिट लाइन दिली आहे. याअंतर्गत 40 हजार टन डिझेल घेऊन मालवाहू जहाज श्रीलंकेत पोहोचले आहे.
पर्यटन ठप्प झाल्याने देश बुडाला कर्जात
श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पण कोरोनाच्या प्रभावामुळे ते आधीच ठप्प झाले आहे. पर्यटन हा देशासाठी परकीय चलनाचा तिसरा सर्वात मोठा स्त्राsत आहे. ती कमकुवत झाल्यामुळे देशाचा परकीय चलनाचा साठा जवळपास रिकामा झाला आहे. श्रीलंकेचे सुमारे 5 लाख लोक थेट पर्यटनावर अवलंबून आहेत, तर 20 लाख लोक अप्रत्यक्षपणे त्याच्याशी जोडले गेले आहेत. श्रीलंकेला पर्यटनातून दरवषी सुमारे 5 अब्ज डॉलर (सुमारे 37 हजार कोटी रुपये) परकीय चलन मिळते.