सांगली
सांगलीकरांनी रविवारी शहरातील कृष्णा घाट परिसरात एकत्र येऊन दिवे लावून व कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. सांगलीकरानी लावलेल्या हजारो दिव्यांनी नदी पात्र आणि घाट परिसर रविवारी उजळून निघाला होता.
सांगलीकरांनी शहरातील कृष्णा घाटावर एकत्र येऊन दिवे लावून तसेच कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. त्यामुळे कृष्णा नदी पात्र व घाट परिसर दिव्यांच्या रोषणाईने लखलखून गेला होता.
भगवान श्रीकृष्णाने केलेल्या त्रिपुरासुराच्या वधाचा आनंदोत्सव म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. शहरातही रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात ही पौर्णिमा साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने हजारो सांगलीकरांनी एकत्र येऊन दिवे प्रज्वलित केले. यावेळी सरकारी घाट , माई घाट व संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने
उजळून निघाला होता. यावेळी महिलांनी दिवे प्रज्वलीत करून कृष्णेच्या पात्रातही सोडले. त्यामुळे कृष्णेचे पात्र लखलखून गेले होते. तर हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.