नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी येथे काही आठवडय़ांपूर्वी आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर वाहन घालून त्यांचा मृत्यू घडवून आणल्याच्या प्रकरणात स्वतंत्र चौकशीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून व्हावी, अशी टिप्पणी केली होती. ही टिप्पणी स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता अधोरेखित करते, असे प्रियांका गांधी यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आरोपींची बाजू घेत असल्याचे दिसून येते. हेतुपुरस्सर या प्रकरणाची चौकशी लांबविली जात आहे. बळी गेलेल्या शेतकऱयांना उत्तर प्रदेश सरकारकडून न्याय मिळणार नाही, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयाने स्वतंत्र चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे.