लखनौ
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीश मिश्रा याला पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी तो न्यायालयीन कोठडीत होता. अशा प्रकारे त्याला आतापर्यंत दोनदा पोलीस कोठडी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याच्यासमवेत अंकित दास, शेखर भारती आणि लतीफ यांनाही पोलीस कोठडी देण्यात आली. शेतकऱयांवर कार घालून त्यांना मारण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली असून सुनावणी सुरु आहे.