कोल्हापूर / नीलेश काळे
लग्न म्हंटल की, वारेमाप खर्च,मोठ मोठे आहेर,महागडी पत्रिका, वरात, आदी गोष्टींसाठी लाखोंचा खर्च येतो. पैसे असो वा नसो प्रसंगी कर्ज काढून लग्न करणाऱयांची संख्या कमी नाही. लग्नाला जाताना सर्वात मोठा पडणार प्रश्न म्हणजे आहेर. कारण या आहेरावरुनच मग पुढे रुसवे-फुगवे होत असतात. मात्र या परंपारिक आहेराच्या संकल्पनेला विधायक रुप देण्याचे काम येथील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ऐक्य चळवळीचे संस्थापक व साहित्यिक मच्छिंद्र कांबळे यांनी केले आहे.
साहित्यिक मच्छिंद्र कांबळे यांनी आपल्या दोन्ही मुलींचीं लग्ने बौद्ध पद्धतीने केली. लग्नात महागडा आहेर स्वीकारण्यापेक्षा एक वही गरजू विद्यार्थ्यांसाठी' असा उपक्रम राबविला. महागडी पत्रिका छापून गावात,समाजात चर्चा घडवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.ही पत्रिका कशी हटके होईल याकडेच सर्वांचे लक्ष असते.भलेही ती पत्रिका मग नंतर अडगळीत पडो. यांच्याशी काहीचे देणे घेणे नसते. मात्र कांबळे यांनी अगदी साधी पत्रिका छापली. त्यावर त्यांनी
आपली आपुलकी हाच आमचा आहेर, कृपया आहेर-पुष्पगुच्छ आणू नयेत.आपली एक वही गरीब विद्यार्थ्यांला शिक्षण देऊ शकते’ असा मजकुर छापून शैक्षणिक चळवळीला बळ देण्याच काम केले. मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना खर्चात पाडण्यापेक्षा त्यांच्याकडून एक वही भेटरुपी स्वीकारली. या जमा झालेल्या हाजारो वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. मुलींच्या लग्नात वही भेट घेत शैक्षणिक चळवळ भक्क्म करत वऱहाडींना वाचन-लेखन-शैक्षणिक चळवळ जपण्याचा संदेश दिला आहे. यावेळी स्वागत करताना फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीतील पुस्तके भेट देत पाहुण्यांचे स्वागत केले.यामध्ये आंबेडकरी साहित्यावरील मच्छिंद्र कांबळे यांची पुस्तके होती.
हल्ली श्रीमंतीचे दर्शन घडवण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र या परंपरेला छेद देत नवा पायंडा पाडण्याचे काम साहित्यिक कांबळे यांनी केले आहे. कांबळे यांच्या मुली प्रज्ञा आणि तेजश्री दोघीही उच्चशिक्षित आहेत. दोघींनीही एमबीए केले असून आहेर म्हणून पैसे,वस्तू न स्वीकारता एक वही गरजू विद्यार्थ्यांसाठी हाच उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नात आहेर म्हणून वस्तू देतात; यासाठी नातेवाईक पैसे नसले तर कर्ज काढून आहेर आणतात. असे असले तरी आता याचेही